शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

चंगेझ खान- शेकडो मुलांचा बाप, पण शेवटी एकटाच


13 व्या शतकाच्या सुरुवातीला मध्य आशियाच्या विशाल गवताळ प्रदेशातून एक तरुण योद्धा पुढे आला. त्याचे नाव होते तेमुजीन. पुढे हाच तेमुजीन जगाच्या इतिहासात चंगेझ खान या नावाने प्रसिद्ध झाला. त्याने विखुरलेल्या मंगोल जमातींना एकत्र करून अशी लष्करी ताकद निर्माण केली की, चीनपासून मध्य आशियापर्यंतचे बहुतांश प्रदेश त्याच्या नियंत्रणाखाली आले. त्याच्या सैन्याच्या वेगाने व युद्धतंत्राने तत्कालीन राजवटी अक्षरशः हादरल्या. यामुळे त्यांचे साम्राज्य मानवी इतिहासातील सर्वात प्रभावशाली साम्राज्यांपैकी एक बनले. Genghis Khan

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

शाहबानो खटला! Shah Bano Case


 तलाक... तलाक... तलाक...

फक्त 3 शब्द. तीनदा उच्चारले की मुस्लिम महिलेचे अवघ्ये आयुष्यच एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जाते. 

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

वैदिकांचं हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणधर्म -राजू परुळेकर


हिंदू हा फारसी शब्द आहे. ‘हिंद’ आणि ‘हिंदू या शब्दांचा धर्माशी खरंतर काही संबंध नाही. सिंधू नदीच्या पलिकडील भौगोलिक कक्षेत येणाऱ्या प्रदेशाला ‘हिंद’ असं म्हटलं जातं. ‘हिंद’ या शब्दाचा उल्लेख उमर खैय्यामने बाराव्या शतकातही केला होता. सुभाषबाबूंनी दिलेली ‘जय हिंद’ ही घोषणा कोणत्याही धर्मासाठी नव्हती. ‘हिंदवी स्वराज्य’ हा शब्दही धर्ममूलक नाही तर तो प्रदेशाशी संबंधित आहे. हिंद, हिंदू, हिंदुस्तान या सगळ्या शब्दांचा धर्माशी मूलतः संबंधच नाही. Hindutva and Brahminism

रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

नारायण मेघाजी लोखंडे


रविवार, हा दिवस आपला प्राणवायू. संपूर्ण आठवड्याची थकावट हा दिवस दूर करतो. पण रविवारची ही साप्ताहिक सुट्टी आपल्या पदरात कशी पडली? त्यासाठी कुणी व किती संघर्ष केला? आपल्यासारख्या कामगार लोकांसाठी आठवड्यात एक दिवस सुट्टी मिळावी म्हणून आपले जीवन कुणी खर्ची घातले? हे आपल्याला माहिती असलेच पाहिजे. 

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई


अवघ्या पंचविसाव्या वर्षी ऐन तारुण्यात महाराणी ताराबाईंवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. मोगल-मराठा संघर्षात राजाराममहाराजांच्या मृत्यूने मराठ्यांची खूप मोठी हानी झाली. राजाराम महाराजांच्या जाण्यामुळे जी एक पोकळी निर्माण झाली होती, ती ताराबाईंनी आपल्या कर्तृत्वाने भरून काढली. काळाने दिलेले आव्हान स्वीकारून त्यांनी हिंदुस्थानाच्या इतिहासात शौर्यशाली राणी म्हणून लौकिक मिळविला. कवी देवदत्त आपल्या काव्यात तिच्या कर्तृत्वाचे वर्णन करतो :

"दिल्ली झाली दीनवाणी

दिल्लीशाचे गेले पाणी

ताराबाई रामराणी

भद्रकाली कोपली ।।.....

रामराणी भद्रकाली

रणरंगी कुद्ध झाली

प्रलयाची वेळ आली

मुगलहो सांभाळा ||"

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

पृथ्वीला दोन चंद्र असते तर काय झाले असते?

कल्पना करा... मध्यरात्रीची वेळ आहे. शहर झोपले आहे. आकाशात तारे चमकत आहेत. तुम्ही वर पाहता आणि नेहमीसारखा एक चंद्र दिसण्याऐवजी दोन प्रचंड चंद्र आकाशात तरंगताना दिसतात. एक चंद्र क्षितिजाच्या जवळ आहे, तर दुसरा आकाशाच्या माथ्यावर. दोन्हींच्या प्रकाशाने समुद्राच्या लाटा चमकत आहेत. काळोखातही पृथ्वीचा बराचसा भाग चांदण्याने उजळून निघाला आहे.

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

'गुमनाबी बाबा'च नेताजी होते का? रहस्य काय?


 18 ऑगस्ट 1945. तैहोकू, फॉर्मोसा.

दुसरे महायुद्ध संपण्याच्या मार्गावर होते. जपान पराभूत झाला होता. ब्रिटिश साम्राज्य अजूनही भारतावर राज्य करत होते. याचवेळी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात सशस्त्र लढा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

बातमी धक्कादायक होती. पण त्याहून मोठे रहस्य भविष्यात उदरात दडले होते. नेताजींचे पार्थिव भारतात आले नाही. त्यांच्या मृत्यूचे पुरावे सर्वमान्य होतील अशा पद्धतीने केव्हाच समोर आले नाही. त्यामुळे काही वर्षांनी नेताजी जिवंत असल्याच्या कथा सुरू झाल्या. त्यामुळे आजही नेताजींचा मृत्यू नेमका कसा झाला? हा प्रश्न उपस्थित केला जातो. Netaji Subhas Chandra Bose, Netaji Plane Crash, 

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

बंडखोर सूर - Frankfurt Hot Club ची कहाणी


फ्रँकफर्टमधील एका छोट्याशा जागेत रात्री उशिरापर्यंत जॅझचे सूर घुमत होते. बाहेर युद्धाचे ढग होते. शहरावर नाझींची सत्ता होती. प्रत्येक संशयास्पद हालचालींवर Gestapo ची नजर होती. आत काही तरुण संगीताच्या तालावर हरवून गेले होते. अचानक दरवाजावरचा पहारेकरी धावत आत आला. त्याने फक्त एवढेच सांगितले, Gestapo येत आहे. 

काही सेकंदांत वातावरण बदलले. जॅझ  थांबला आणि नाझींना मान्य असलेले संगीत सुरू झाले. हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील वाटतो, पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फ्रँकफर्टमध्ये हे खरोखरच घडत होते.

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

अवघ्या १० लोकांचे गाव, आता गजबजणार


उत्तर स्पेनमधील बुर्गोस प्रांतात वसलेले अवेलेनोसा डे मुन्यो हे गाव नकाशावर शोधले, तर ते एखाद्या गजबजलेल्या पर्यटनस्थळासारखे अजिबात वाटत नाही. गावात आता मोजकेच लोक राहतात. रस्त्यांवर गर्दी नाही, दुकानांची लगबग नाही आणि पर्यटकांची रांगही नाही. बंद पडलेला बार आणि कधीच न उघडणारे दारूचे गोदाम गावाच्या बदललेल्या काळाची साक्ष देतात. उन्हाळ्यात लॅव्हेंडरच्या झुडपांभोवती फिरणाऱ्या मधमाशांचा आवाजच अनेकदा इथली प्रमुख हालचाल असते. कधी एखादा ट्रॅक्टर जातो आणि शांततेचा पडदा काही क्षणांसाठी बाजूला होतो. Avelenosa de Munyo

बेनझीर सरकार लष्कराने बरखास्त केले होते का?


पाकिस्तानच्या राजकारणात लोकशाही सरकार आणि लष्कर यांच्यातील संघर्ष हा नवा विषय नाही. पाकिस्तानच्या स्थापनेपासूनच लष्कराने देशाच्या राजकीय व्यवस्थेवर मोठा प्रभाव ठेवला आहे. अनेक वेळा लष्कराने थेट सत्ता हातात घेतली, तर काही वेळा राष्ट्रपती, गुप्तचर यंत्रणा आणि राजकीय नेत्यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सरकारवर दबाव आणला गेला. Pakistan