Maratha Empire लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Maratha Empire लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई


अवघ्या पंचविसाव्या वर्षी ऐन तारुण्यात महाराणी ताराबाईंवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. मोगल-मराठा संघर्षात राजाराममहाराजांच्या मृत्यूने मराठ्यांची खूप मोठी हानी झाली. राजाराम महाराजांच्या जाण्यामुळे जी एक पोकळी निर्माण झाली होती, ती ताराबाईंनी आपल्या कर्तृत्वाने भरून काढली. काळाने दिलेले आव्हान स्वीकारून त्यांनी हिंदुस्थानाच्या इतिहासात शौर्यशाली राणी म्हणून लौकिक मिळविला. कवी देवदत्त आपल्या काव्यात तिच्या कर्तृत्वाचे वर्णन करतो :

"दिल्ली झाली दीनवाणी

दिल्लीशाचे गेले पाणी

ताराबाई रामराणी

भद्रकाली कोपली ।।.....

रामराणी भद्रकाली

रणरंगी कुद्ध झाली

प्रलयाची वेळ आली

मुगलहो सांभाळा ||"

रविवार, २० जुलै, २०२५

अहिल्याबाई होळकर : न्यायप्रिय व लोककल्याणकारी राणीचा आदर्श जीवनप्रवास

महिला शासकांनी आपले कर्तृत्व व नेतृत्वाच्या जोरावर इतिहासाच्या पानावर आपला अमिट ठसा उमटवला. प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत त्यांनी राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता, धैर्य व दूरदृष्टीने समाजाला दिशा दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एक नवा अध्याय रचला. आपल्या शासनकाळात त्यांनी केवळ सत्ताच टिकवली नाही, तर समाजात प्रगती, सुधारणा व स्थैर्य आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच लिंगभेदाच्या सीमा तोडल्या गेल्या.

अहिल्याबाई होळकर मराठा साम्राज्यातील माळवा प्रांताच्या अशाच एक थोर व दूरदृष्टीच्या शासक होत्या. त्यांनी न्याय, धर्म, प्रशासन व समाजसुधारणांत आपले अतुलनीय योगदान दिले. त्यांच्या नम्र, न्यायी व कणखर नेतृत्वामुळे त्यांना पुण्यश्लोक ही पदवी मिळाली. त्यांचा त्रिशताब्दी जयंती सोहळा शनिवारी संपन्न झाला. चला तर मग आज पाहूया पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास...