Rajaram Maharaj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Rajaram Maharaj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई


अवघ्या पंचविसाव्या वर्षी ऐन तारुण्यात महाराणी ताराबाईंवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. मोगल-मराठा संघर्षात राजाराममहाराजांच्या मृत्यूने मराठ्यांची खूप मोठी हानी झाली. राजाराम महाराजांच्या जाण्यामुळे जी एक पोकळी निर्माण झाली होती, ती ताराबाईंनी आपल्या कर्तृत्वाने भरून काढली. काळाने दिलेले आव्हान स्वीकारून त्यांनी हिंदुस्थानाच्या इतिहासात शौर्यशाली राणी म्हणून लौकिक मिळविला. कवी देवदत्त आपल्या काव्यात तिच्या कर्तृत्वाचे वर्णन करतो :

"दिल्ली झाली दीनवाणी

दिल्लीशाचे गेले पाणी

ताराबाई रामराणी

भद्रकाली कोपली ।।.....

रामराणी भद्रकाली

रणरंगी कुद्ध झाली

प्रलयाची वेळ आली

मुगलहो सांभाळा ||"