बुधवार, १६ सप्टेंबर, २०२६

चीनच्या शेतात माणूस नाही, ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर राबतोय


कल्पना करा, सकाळची वेळ आहे. शेतात एक ट्रॅक्टर सुरू होतो. त्याच्या सीटवर चालक नाही. तरीही तो ठरलेल्या मार्गाने शेत नांगरतो, वळण घेतो आणि पुन्हा अचूक रेषेत पुढे जातो. GPS, sensors, cameras आणि artificial intelligence यांच्या मदतीने हे शक्य होत आहे. चीनमध्ये अशा autonomous tractor आणि unmanned farming तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे अहवाल सांगतात. चीनची स्मार्ट शेती आता केवळ प्रयोगशाळेतील कल्पना राहिलेली नाही.

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६

AI आपल्या सर्वांना मारून टाकेल का?


Artificial Intelligence (AI) ने अवघ्या 4 वर्षांत आपले जग बदलून टाकले आहे. कधी तो गणितातील न सुटलेली कोडी सोडवतो, तर कधी आपल्या नोकऱ्या खाण्याच्या मार्गावर येतो. आता Anthropic AI च्या एका संशोधकाने असे म्हणत राजीनामा दिला आहे की, AI येत्या 10 वर्षांत समस्त मनुष्यजातीचा नाश करू शकतो. या दाव्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. AI च्या आंधळ्या शर्यतीत सावधगिरीकडे दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्न यासंबंधी उपस्थित केला जात आहे. 

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

चंगेझ खान- शेकडो मुलांचा बाप, पण शेवटी एकटाच


13 व्या शतकाच्या सुरुवातीला मध्य आशियाच्या विशाल गवताळ प्रदेशातून एक तरुण योद्धा पुढे आला. त्याचे नाव होते तेमुजीन. पुढे हाच तेमुजीन जगाच्या इतिहासात चंगेझ खान या नावाने प्रसिद्ध झाला. त्याने विखुरलेल्या मंगोल जमातींना एकत्र करून अशी लष्करी ताकद निर्माण केली की, चीनपासून मध्य आशियापर्यंतचे बहुतांश प्रदेश त्याच्या नियंत्रणाखाली आले. त्याच्या सैन्याच्या वेगाने व युद्धतंत्राने तत्कालीन राजवटी अक्षरशः हादरल्या. यामुळे त्यांचे साम्राज्य मानवी इतिहासातील सर्वात प्रभावशाली साम्राज्यांपैकी एक बनले. Genghis Khan

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

शाहबानो खटला! Shah Bano Case


 तलाक... तलाक... तलाक...

फक्त 3 शब्द. तीनदा उच्चारले की मुस्लिम महिलेचे अवघ्ये आयुष्यच एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जाते. 

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

वैदिकांचं हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणधर्म -राजू परुळेकर


हिंदू हा फारसी शब्द आहे. ‘हिंद’ आणि ‘हिंदू या शब्दांचा धर्माशी खरंतर काही संबंध नाही. सिंधू नदीच्या पलिकडील भौगोलिक कक्षेत येणाऱ्या प्रदेशाला ‘हिंद’ असं म्हटलं जातं. ‘हिंद’ या शब्दाचा उल्लेख उमर खैय्यामने बाराव्या शतकातही केला होता. सुभाषबाबूंनी दिलेली ‘जय हिंद’ ही घोषणा कोणत्याही धर्मासाठी नव्हती. ‘हिंदवी स्वराज्य’ हा शब्दही धर्ममूलक नाही तर तो प्रदेशाशी संबंधित आहे. हिंद, हिंदू, हिंदुस्तान या सगळ्या शब्दांचा धर्माशी मूलतः संबंधच नाही. Hindutva and Brahminism

रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

नारायण मेघाजी लोखंडे


रविवार, हा दिवस आपला प्राणवायू. संपूर्ण आठवड्याची थकावट हा दिवस दूर करतो. पण रविवारची ही साप्ताहिक सुट्टी आपल्या पदरात कशी पडली? त्यासाठी कुणी व किती संघर्ष केला? आपल्यासारख्या कामगार लोकांसाठी आठवड्यात एक दिवस सुट्टी मिळावी म्हणून आपले जीवन कुणी खर्ची घातले? हे आपल्याला माहिती असलेच पाहिजे. 

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई


अवघ्या पंचविसाव्या वर्षी ऐन तारुण्यात महाराणी ताराबाईंवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. मोगल-मराठा संघर्षात राजाराममहाराजांच्या मृत्यूने मराठ्यांची खूप मोठी हानी झाली. राजाराम महाराजांच्या जाण्यामुळे जी एक पोकळी निर्माण झाली होती, ती ताराबाईंनी आपल्या कर्तृत्वाने भरून काढली. काळाने दिलेले आव्हान स्वीकारून त्यांनी हिंदुस्थानाच्या इतिहासात शौर्यशाली राणी म्हणून लौकिक मिळविला. कवी देवदत्त आपल्या काव्यात तिच्या कर्तृत्वाचे वर्णन करतो :

"दिल्ली झाली दीनवाणी

दिल्लीशाचे गेले पाणी

ताराबाई रामराणी

भद्रकाली कोपली ।।.....

रामराणी भद्रकाली

रणरंगी कुद्ध झाली

प्रलयाची वेळ आली

मुगलहो सांभाळा ||"

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

पृथ्वीला दोन चंद्र असते तर काय झाले असते?

कल्पना करा... मध्यरात्रीची वेळ आहे. शहर झोपले आहे. आकाशात तारे चमकत आहेत. तुम्ही वर पाहता आणि नेहमीसारखा एक चंद्र दिसण्याऐवजी दोन प्रचंड चंद्र आकाशात तरंगताना दिसतात. एक चंद्र क्षितिजाच्या जवळ आहे, तर दुसरा आकाशाच्या माथ्यावर. दोन्हींच्या प्रकाशाने समुद्राच्या लाटा चमकत आहेत. काळोखातही पृथ्वीचा बराचसा भाग चांदण्याने उजळून निघाला आहे.