महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक खून, कटकारस्थानं आणि सत्तासंघर्ष गाजले; मात्र 2006 मधील पवनराजे निंबाळकर हत्याकांड हे त्यापैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेले प्रकरण मानले जाते. या हत्येने केवळ उस्मानाबाद (सध्याचा धाराशिव) जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. कारण या प्रकरणात राजघराण्याशी संबंधित व्यक्ती, जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय नेतृत्व, कौटुंबिक वाद, स्थानिक सत्तासंघर्ष आणि नंतर झालेला सीबीआय तपास अशा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. Pavanraje Nimbalkar Murder Case
आजही अनेकांना प्रश्न पडतो की पवनराजे निंबाळकर यांची हत्या नेमकी का झाली? निंबाळकर कुटुंबातील वाद काय होता? तपास कुठवर पोहोचला? न्यायालयाने काय निर्णय दिला? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.
