बुधवार, १५ जुलै, २०२६
अंतराळात सापडली जीवननिर्मितीची 'साखर'
मानवजातीसमोर शतकानुशतके उभा असलेला एक प्रश्न आजही अनुत्तरित आहे, तो म्हणजे पृथ्वीवर जीवनाची सुरुवात नेमकी कशी झाली? जीवनासाठी आवश्यक असलेले रासायनिक घटक पृथ्वीवरच तयार झाले की, ते अंतराळातून आले? या प्रश्नांची उत्तरे शोधताना शास्त्रज्ञांना आता एक अत्यंत महत्त्वाचा धागा सापडला आहे.
सोमवार, १३ जुलै, २०२६
'लाइटहाऊस नेब्युला'तील पल्सारच्या चुंबकीय क्षेत्राचा पहिला थेट नकाशा; नासाच्या IXPE दुर्बिणीची ऐतिहासिक कामगिरी
विश्वातील सर्वात शक्तिशाली आणि रहस्यमय खगोलीय वस्तूंमध्ये न्यूट्रॉन तारे (Neutron Stars) अग्रस्थानी मानले जातात. अशाच एका न्यूट्रॉन ताऱ्याभोवती असलेल्या PSR J1101-6101 या पल्सारच्या चुंबकीय क्षेत्राचा पहिल्यांदाच थेट अभ्यास करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. हा शोध NASA च्या Imaging X-ray Polarimetry Explorer (IXPE) या अवकाश दुर्बिणीने लावला असून, त्याचे निष्कर्ष The Astrophysical Journal मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या संशोधनामुळे पल्सारमधून बाहेर पडणाऱ्या अतिउच्च-ऊर्जेच्या कणांचा प्रवास, त्यांच्याभोवती असलेली चुंबकीय रचना आणि विश्वातील अत्यंत ऊर्जावान प्रक्रियांबद्दल अधिक स्पष्ट माहिती मिळाली आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने हा शोध महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
रविवार, ७ डिसेंबर, २०२५
बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५
चंद्रावर पाणी असेल का? शोध, पुरावे अन् शक्यता
मानवाच्या ब्रह्मांड - शोधाच्या प्रवासात चंद्र हा सदैव आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र अनेकार्थाने आपल्याला परिचित वाटतो. तो रोजच्या आकाशात दिसतो, त्याच्याबद्दल कथा-पुराणं आहेत, तर अनेक शतके कवी आणि वैज्ञानिक या दोघांचीही उत्सुकता चंद्राने जागृत केली आहे. मात्र ‘चंद्रावर पाणी असेल का?’ हा प्रश्न वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आणि जटिल आहे. कारण पाणी म्हणजे जीवनाची पहिली अट. पाणी म्हणजे मानवी वस्ती, भविष्यातील स्पेस बेस, संशोधन केंद्रे आणि दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक घटक. म्हणूनच जगभरातील अंतराळ संस्था चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेत आल्या आहेत.
सोमवार, २५ डिसेंबर, २०२३
शास्त्रज्ञ अंतराळात लावणार छत्री, पण का?
ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढ जगातील एक सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीच्या तापमानात दरवर्षी झपाट्याने वाढ होत आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करत आहेत. त्यातच आता त्यांनी यावर उपाय म्हणून पृथ्वीचे सूर्यापासून निघणाऱ्या सौर ज्वाळांपासून संरक्षण करण्यासाठी अंतराळात एक सुरक्षा छत्री लावण्याचा निर्धार केला आहे. जागतिक जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी अवकाश-आधारित सनशेड्सचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासगट तयार केला आहे. हा गट अंतराळात छत्री लावण्याच्या संकल्पनेवर गत अनेक वर्षांपासून उहापोह करत आहे. विशेषतः प्लॅनेटरी सनशेड फाउंडेशन ही संकल्पना मूर्त रुपात आणण्यासाठी अहोरात्र काम करत आहे.
या फाउंडेशनच्या मते, सौर किरणोत्सर्गाचे व्यवस्थापन हा ग्लोबल वॉर्मिंगवर सर्वोत्तम उपाय ठरेल. जागतिक तापमानवाढीचे परिणाम कमी करण्याचे 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे उत्सर्जन कमी करणे, दुसरा कार्बन डायऑक्साइड काढून टाकणे व तिसरा म्हणते सौर किरणोत्सर्गाचे व्यवस्थापन करणे. जगाचे सरासरी तापमान सध्याच्या सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढण्यापासून रोखण्याच्या मुद्यावर एक करार झाला आहे. परंतु तापमान जेवढे कमी होईल तेवढे जागतिक तापमानवाढीचे परिणाम कमी होतील. संशोधकांनी पुढील दशकात तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा दिला आहे.
जागतिक तापमानवाढ कशी थांबवता येईल?
जागतिक तापमानवाढ समुद्राच्या पातळीत वाढ होणे, जंगलात वणवा भडकणे व बर्फ वितळण्यासारख्या अत्यंत टोकाच्या हवामानाच्या घटनांसाठी जबाबदार आहे. मॉर्गन गुडविन हे प्लॅनेटरी सनशेड फाउंडेशनचे कार्यकारी संचालक आहेत. अंतराळात सनशेड्स तयार करण्याच्या प्रकल्पावर ते म्हणतात, सध्या डीकार्बोनायझेशन धोरण आवश्यक आहे. त्यांच्या मते, जागतिक तापमानवाढीचे सर्वात वाईट परिणाम टाळण्यासाठी जगाने जीवाश्म इंधनाचा वापर झपाट्याने बंद केला पाहिजे. वातावरणातून गिगाटन कार्बन काढून टाकण्यासह सौर किर्णोत्सारही अत्यंत मर्यादित करण्याची गरज आहे.
काय आहे प्लॅन?
सूर्याचा किरणोत्सर्ग रोखण्यासाठी अंतराळात एक मेगास्ट्रक्चर तयार केले जाईल. हे मेगास्ट्रक्चर सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान असणाऱ्या लँग्रेज-1 पॉइंटवर स्थापित केले जाईल. प्लॅन असा आहे की, हे मेगास्ट्रक्चर अंतराळात स्थापन केले जाईल तेव्हा ते बहुतांश सूर्यप्रकाश अंतराळात रिफ्लेक्ट अर्थात परावर्तित करेल. हे प्लॅनेटरी फाउंडेशन तयार करणे फारसे अवघड नाही. फाउंडेशनच्या मते, अंतराळ तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. विशेषतः आज अंतराळात माणूस व सामग्री पाठवण्याचा खर्चही कमी झाला आहे. त्यामुळे ही संकल्पना मूर्त रूपात येणे सहज शक्य आहे.
आता अनेकांना प्रश्न पडेल की, ही सूर्यछत्री अर्थात सनशेड सूर्याच्या उष्णतेमुळे जळून जाणार नाही का? तर याचे उत्तर 'नाही' असे आहे.
काय आहे लँग्रेज-1 पॉइंट?
सूर्य व पृथ्वी या दोन्हींच्या आत गुरुत्वाकर्षण आहे. सूर्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पण एका विशिष्ट टप्प्यावर या दोन्हीमधील गुरुत्वाकर्षण एकमेकांना संतुलित करते. याचा अर्थ असा की, या पॉइंटमधून जाणाऱ्या कक्षेत एखादा उपग्रह ठेवला तर तो सूर्य किंवा पृथ्वी या दोघांकडेही खेचला जाणार नाही. सूर्य व पृथ्वी यांत्यातील सरळ रेषेत असेच 5 पॉइंट निश्चित करण्यात आलेत.
त्याला विख्यात गणितज्ज्ञ जोसेफ -लुई लँग्रेज यांच्या नावावरून लँग्रेस पॉइंट्स असे नाव देण्यात आले आहे. त्यापैकी लँग्रेज-1 हा एक असाच पॉइंट आहे. हा लँग्रेज-1 बिंदू पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर पृथ्वी व सूर्य यांच्यातील 100 वा भाग आहे. लँग्रेज-1 चा फायदा असा आहे की, त्यातून जाणाऱ्या कक्षेत फिरणारी वस्तू (ज्याला आपण हॅलो ऑर्बिट म्हणतो) सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणात लपत नाही. अशा या जादुई ठिकाणी अंतराळ छत्री स्थापन करून पृथ्वीचे संरक्षण करण्याचा संशोधकांचा मानस आहे.
आशा आहे की, आजचा ब्लॉगही तुम्हाला आवडला असेल. खाली तुम्ही तुमच्या प्रतिक्रियाही नोंदवू शकता किंवा एखाद्या विषयाची विस्तृत माहिती हवी असेल, तर त्याचीही मागणी करू शकता.
बुधवार, १३ डिसेंबर, २०२३
ब्रह्मांडातील 'ओरडणारे भूत' अन् 'झपाटलेले झाड'
गावी लहानपणी कधी-कधी रात्रीचे भूताखेतांचे किस्से मस्त रंगायचे. माझा भूतांवर विश्वास नाही. पण काही जण खोटे बोलत नाहीत हे माहिती होते. त्यांना थापा मारायची सवय नाही हे सर्वांना माहिती होते. त्यामुळे असे लोक जेव्हा भूताचे अनुभव सांगायचे तेव्हा त्यांना खोटे ठरवणे योग्य वाटायचे नाही. https://bhagyadarshi.blogspot.com/
ज्याची त्याची श्रद्धा कपूर म्हणून मी हे किस्से ऐकायचो... 😄
असे खूप किस्से ऐकले.
त्यात एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे सर्वांना भूत रात्रीच दिसते.
असे का?
सोडा...(बाटलीतला नाही) हा आपला विषय नाही.. असाही ब्रह्मांडाच्या पसाऱ्यात अंधारच शाश्वत आहे...
आज हा विषय आठवण्याचे कारण म्हणजे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) ब्रह्मांडात नुकतेच एक खरेखुरे भूत आढळले आहे... ते ही तोंड आ वासलेले...
आपले ब्रह्मांड अनंत रहस्यमय गोष्टींनी भरलेले आहे. आपल्या कधी कधी या ब्रह्मांडाचे खूप सुंदर रूप दिसते. पण कधी कधी त्याचे आक्राळविक्राळ रुपही नजरेस पडते. नासाला ब्रह्मांडाचे हेच आक्राळविक्राळ रुप नजरेस पडले आहे. नासाने काढलेला एक फोटो जेवढा सुंदर आहे, तेवढाच भितीदायकही आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
2 मोठे डोळे अन् तोंड वासलेले भूत
वास्तविक, जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या (JWST) माध्यमातून नासाला दिसलेले हे दृश्य एखाद्या 'डीप-स्पेस ब्लॉब मॉन्स्टर' अर्थात एखाद्या भितीदायक भूत किंवा राक्षसासारखे आहे. या फोटोत एक प्रचंड आकाराची धुळीची आकाशगंगा दिसत आहे. ती दरवर्षी शेकडो ताऱ्यांना जन्मास घालत आहे. तिचा आकार पाहून ती फारच भितीदायक वाटते. तिच्याकडे बारकाईने पाहून ही आकाशगंगा म्हणजे 2 मोठे डोळे असणारा व तोंड वासलेला ब्रह्मांड राक्षसच दिसते. https://bhagyadarshi.blogspot.com/
केव्हा अस्तित्वात आली ही गॅलक्सी?
ऑस्टिनच्या टेक्सास विद्यापीठाच्या खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष्य या आकाशगंगेने स्वतःकडे वेधून घेतले. त्यानंतर त्यांनी जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या डेटाचे विश्लेषण केले. त्यात AzTECC71 नामक ही आकाशगंगा जवळपास 900 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्याचे निष्पन्न झाले. बारकाईने पाहिल्यास ही आकाशगंगा एखाद्या ओरडणाऱ्या भूतासारखी दिसते.
एक खराखुरा राक्षस
या शोधामुळे शास्त्रज्ञांची सुरुवातीच्या विश्वाबद्दलची समज बदलू शकते. कारण त्यांना पूर्वी ही राक्षसी आकाशगंगा छोटीशी असल्याचे वाटले. पण नंतर ती जवळपास 3 ते 10 पट जास्त दूरवर पसरल्याचे स्पष्ट झाले. टेक्सास विद्यापीठाचे संशोधक जेड मॅककिनी यांनी सांगितले की, या आकाशंगेला खराखुरा राक्षस म्हटले जाऊ शकते, कारण ती एखाद्या थेंबासारखी दिसत असली तरी ती दरवर्षी शेकडो नव्या ताऱ्यांना जन्म देत आहे. या घटनेमुळे आकाशगंगेची एक मोठी संख्या अजूनही आपल्या नजरेपासून दूर असल्याचेही या संशोधनामुळे स्पष्ट झाले आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/
जाता जाता एका झपाटलेल्या झाडाची गोष्ट...
एक दौलतकपूर नावाचे राज्य होते. दौलतसिंह नामक राजा त्यावर राज्य करत होता. राजा आपल्या प्रजेत लोकप्रिय होता. लोकही त्याच्यावर अमाप प्रेम करत होते. एकेदिवशी एक गिधाड आकाशात झपाटलेल्या झाडाचे बीज घेऊन उडत होते. हे गिधाड रौनकपुराहून उडताना त्याच्या तोंडातून हे बीज रौनकपूरच्या मध्यभागी पडले.
बी झपाटलेले होते, त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्याचे रोपट्यात रुपांतर झाले. तिथल्या स्थानिक रहिवाशांनी जेव्हा ते पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. कारण, या रोपाचा रंग काळा होता. हे एखादे जंगली गवत किंवा दुर्मिळ वनस्पती असावी असे त्यांना वाटले. दुसऱ्या दिवशी हे रोप खूप मोठे झाले. एका दिवसात हे रोप एवढे कसे वाढले या विचाराने जनता अधिकच गोंधळली.
अखेर तिसर्या दिवशी त्या रोपाचे झाड झाले. वेळ निघून गेला आणि वेगाने वाढणार्या या वनस्पतीवर विचार करून लोकही काळजीत पडले. त्यांनी हे प्रकरण राजाकडे नेले. या जादुई झाडाची माहिती मिळताच राजा तत्काळ झाडापाशी पोहोचला. एका काळ्या रंगाच्या रोपाचे 3 दिवसांत झाडात रूपांतर झाल्यामुळे राजालाही आश्चर्य वाटले. https://bhagyadarshi.blogspot.com/
चौथ्या दिवशी राजा स्वतः त्या झाडाजवळ पोहोचला. तोपर्यंत ते झाड खूप मोठे झाले होते. ते एवढ्या वेगाने वाढले होते की, कुणाचाही विश्वास बसत नव्हता. या झाडाचा रंग काळा असल्यामुळे राजाला हा प्रकार जादुटोण्याचा असावा असा संशय आला. हाच विचार करून राजाने घोषणा केली की, जो कुणी या झाडाचा नाश करेल त्याला 1 हजार सोन्याची नाणी बक्षीस म्हणून देण्यात येतील. एवढेच नाही तर राजाने या झाडाचा नायनाट करणाऱ्याला आपला उत्तराधिकारी बनवण्याचीही घोषणा केली.
एवढी मोठी घोषणा ऐकून सर्वांनीच झाड तोडण्याचा विचार सुरू केला. राजाच्या हुशार मंत्र्यांनीही आपापल्या परीने प्रयत्न केले, पण कुणीही झाड नष्ट करू शकले नाही. एकाने या झाडाभोवती आग लावली. तर दुसऱ्याने ते झपाटलेले झाड हत्तीने ओढून पाडण्याचा प्रयत्न केला. पण झाड जागचे हलले नाही.
हे पाहून लोक घाबरले... हे झाड भुताटकीने झपाटलेले आहे अशी त्यांची खात्री पटली. तेव्हा त्या गावातील एका हुशार माणसाच्या कानावर राजाची घोषणा पडली. त्यानंतर लगेच तो व्यक्ती आपल्या गुरूंकडे गेला. आणि त्या झपाटलेल्या झाडाशी संबंधित रहस्य जाणून घेतले.
गुरुजींनी आपल्या शक्तीने त्या विचारले, "तुला झाड नष्ट करायचे आहे का?"
त्या हुशार व्यक्तीने उत्तर दिले, “हो, गुरुजी. सर्वजण त्याच्यामुळे परेशान आहेत.”
गुरुजींनी सांगितले की, त्याचा नायनाट करण्याचा एकच मार्ग आहे. त्यासाठी त्या झाडाभोवती मीठ टाकावे लागेल.
ही युक्ती कळताच ती व्यक्ती ताबडतोब राजाकडे गेली आणि म्हणाली की, तुम्हाला या झाडाभोवती मीठ टाकावे लागेल. असे केल्यानेच हे झाड मरेल. राजाने आपल्या सैनिकांना तसे करण्यास सांगितले. सैनिकांनी मिळून झाडाभोवती भरपूर मीठ ओतले. https://bhagyadarshi.blogspot.com/
मीठ घातल्यानंतर अवघ्या एका दिवसातच झाडाचा आकार काहीसा कमी झाला. त्यानंतर 5 व्या दिवशी झाड अगदी लहान झाले. त्यानंतर ते वाळून नष्ट झाले. त्या हुशार माणसाची युक्ती यशस्वी ठरली होती. त्यामुळे राजाने प्रसन्न होऊन त्याला 1 हजार सोन्याच्या नाण्याची थैली व एक सनद दिली. या सनदीवर राजाच्या मृत्यूनंतर हा व्यक्ती त्याचे सिंहासन सांभाळेल असे नमूद होते. राजाच्या या घोषणेमुळे हा हुशार व्यक्ती आनंदाने आपल्या घरी परतला...
मॉरल ऑफ द स्टोरी - जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. फक्त संयम अन् ती समजून घेण्याची गरज असते. https://bhagyadarshi.blogspot.com/





.jpeg)


