पीएम मोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पीएम मोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

पीएम मोदींनी भारतात जातीय भेदभाव वाढवला का?



भारत हा ऐतिहासिकदृष्ट्या जातीय विभाजनाने प्रभावित देश आहे. जात ही सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावर खोलवर रुजलेली व्यवस्था असल्यामुळे कोणत्याही सरकारच्या काळात तिच्यात तत्काळ बदल घडणे अवघड आहे. 2014 नंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात आलेल्या सरकारने “सबका साथ, सबका विकास” हा नारा दिला. या घोषणेमुळे जातीपेक्षा विकास आणि गरिबी यांना प्राधान्य दिले जाईल अशी अपेक्षा व्यक्त झाली. मात्र, गेल्या दहा वर्षांत जातीय वातावरण अधिक सुधारले की बिघडले? याबाबत दोन्ही बाजूंनी दावे आणि प्रतिदावे सातत्याने पुढे येत राहिले.

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

एकेकाळी जर्मनीत प्रत्येक घर हिटलरचे मंदिर होते



जर्मनीत एक काळ असा होता, जेव्हा हिटलरची लोकप्रियता कळसाला पोहोचली होते. तिथे हर घर, हिटलरचे मंदिर झाले होते. राष्ट्रवादाच्या या उत्सवाच्या काळात प्रत्येक घर नाझी विचारधाराने रंगले गेले होते. राजकारण घरांच्या भीतींपर्यंत पोहोचले होते. 

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

सरकारी कार्यालयातील जातीभेद: सतीश डोंगरे प्रकरण आणि सामाजिक वास्तव

भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे उलटली, तरीही जाती आधारित भेदभावाचे विषारी पडसाद आजही समाजात आणि अगदी सरकारी यंत्रणेतही कायम आहेत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील मध्य प्रदेश गृह विकास महामंडळात कार्यरत असिस्टंट जनरल मॅनेजर सतीश डोंगरे यांच्यावर झालेला कथित भेदभाव हा याच सामाजिक कुरीतीचा एक धक्कादायक नमुना आहे. गेल्या दीड वर्षांपासून डोंगरे यांना टेबल आणि खुर्ची नाकारण्यात आली असून, त्यांना जमिनीवर बसून आपले काम करावे लागत आहे. या प्रकरणाने केवळ सरकारी यंत्रणेची असंवेदनशीलताच उघड केली नाही, तर भारतीय संविधानातील समता आणि न्यायाच्या तत्त्वांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे प्रकरण समाजातील खोलवर रुजलेल्या जातीवादाच्या समस्येचे आणि त्याला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर उपाययोजनांचे प्रतीक आहे.

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

मुथुलक्ष्मी रेड्डी: भारताच्या पहिल्या महिला आमदार आणि देवदासी प्रथेच्या विरोधातील लढवय्या

भारताच्या उत्थानात महिलांचे योगदान हे एखाद्या तेजस्वी दीपस्तंभासारखे आहे. कुटुंबाच्या स्नेहमयी मायेपासून स्वातंत्र्याच्या रणांगणापर्यंत, शिक्षण, विज्ञान, कला, आरोग्य व सामाजिक क्रांतीच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इतिहास रचला. त्यातून भारताच्या प्रगतीचा मार्ग प्रकाशमान झाला. महिलांनी आपले अटळ धैर्य, असीम करुणा तथा दृढनिश्चयाने केवळ आपली स्वप्नेच सत्यात उतरवली नाही, तर सामाजिक वाईटांविरोधातही कंबर कसून लढा दिला. भारताच्या इतिहासात अशा अनेक थोर महिला होऊन गेल्यात. चला तर मग पाहूया महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा संघर्षमय जीवनपट... मुथुलक्ष्मी रेड्डी ह्या भारताच्या पहिल्या हाऊस सर्जन तथा स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिल्या महिला आमदार होत्या. त्यांचा जन्म 30 जुलै 1886 रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण स्वामी अय्यर असे होते. ते महाराजा महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांच्या मातोश्री चंद्रामाई यांचा देवदासी समुदायाशी संबंध होता.