रविवारची सकाळ वेगळीच असते. आळशी ऊन खिडकीतून आत येतं, पंख्याची हळुवार हवा कानात गाणं गुणगुणते, आणि अचानक बाबांचा फोन येतो, “आज संभाजीनगरला येतोय, जेवण घेऊन.”
पहिल्यांदा वाटतं, मजा करतायत. तीनशे किलोमीटर अंतर, फक्त जेवणासाठी? सकाळची रेल्वे हुकते. वाटतं मजा घेतली. पण मध्यरात्री दीड वाजता दाराची बेल वाजते आणि दरवाजा उघडताच बाबांच्या हातात ती मोठी स्टीलची डब्याची बॅग दिसते, तेव्हा कळतं की ही मजा नव्हे, ही प्रेमाची सवय आहे जी वर्षानुवर्षे चालत आली आहे.

.jpg)
