भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

सोमवार, २५ डिसेंबर, २०२३

शास्त्रज्ञ अंतराळात लावणार छत्री, पण का?



ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढ जगातील एक सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीच्या तापमानात दरवर्षी झपाट्याने वाढ होत आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करत आहेत. त्यातच आता त्यांनी यावर उपाय म्हणून पृथ्वीचे सूर्यापासून निघणाऱ्या सौर ज्वाळांपासून संरक्षण करण्यासाठी अंतराळात एक सुरक्षा छत्री लावण्याचा निर्धार केला आहे. जागतिक जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी अवकाश-आधारित सनशेड्सचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासगट तयार केला आहे. हा गट अंतराळात छत्री लावण्याच्या संकल्पनेवर गत अनेक वर्षांपासून उहापोह करत आहे. विशेषतः प्लॅनेटरी सनशेड फाउंडेशन ही संकल्पना मूर्त रुपात आणण्यासाठी अहोरात्र काम करत आहे.

या फाउंडेशनच्या मते, सौर किरणोत्सर्गाचे व्यवस्थापन हा ग्लोबल वॉर्मिंगवर सर्वोत्तम उपाय ठरेल. जागतिक तापमानवाढीचे परिणाम कमी करण्याचे 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे उत्सर्जन कमी करणे, दुसरा कार्बन डायऑक्साइड काढून टाकणे व तिसरा म्हणते सौर किरणोत्सर्गाचे व्यवस्थापन करणे. जगाचे सरासरी तापमान सध्याच्या सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढण्यापासून रोखण्याच्या मुद्यावर एक करार झाला आहे. परंतु तापमान जेवढे कमी होईल तेवढे जागतिक तापमानवाढीचे परिणाम कमी होतील. संशोधकांनी पुढील दशकात तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा दिला आहे. 



जागतिक तापमानवाढ कशी थांबवता येईल?

जागतिक तापमानवाढ समुद्राच्या पातळीत वाढ होणे, जंगलात वणवा भडकणे व बर्फ वितळण्यासारख्या अत्यंत टोकाच्या हवामानाच्या घटनांसाठी जबाबदार आहे. मॉर्गन गुडविन हे प्लॅनेटरी सनशेड फाउंडेशनचे कार्यकारी संचालक आहेत. अंतराळात सनशेड्स तयार करण्याच्या प्रकल्पावर ते म्हणतात, सध्या डीकार्बोनायझेशन धोरण आवश्यक आहे. त्यांच्या मते, जागतिक तापमानवाढीचे सर्वात वाईट परिणाम टाळण्यासाठी जगाने जीवाश्म इंधनाचा वापर झपाट्याने बंद केला पाहिजे. वातावरणातून गिगाटन कार्बन काढून टाकण्यासह सौर किर्णोत्सारही अत्यंत मर्यादित करण्याची गरज आहे.



काय आहे प्लॅन?

सूर्याचा किरणोत्सर्ग रोखण्यासाठी अंतराळात एक मेगास्ट्रक्चर तयार केले जाईल. हे मेगास्ट्रक्चर सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान असणाऱ्या लँग्रेज-1 पॉइंटवर स्थापित केले जाईल. प्लॅन असा आहे की, हे मेगास्ट्रक्चर अंतराळात स्थापन केले जाईल तेव्हा ते बहुतांश सूर्यप्रकाश अंतराळात रिफ्लेक्ट अर्थात परावर्तित करेल. हे प्लॅनेटरी फाउंडेशन तयार करणे फारसे अवघड नाही. फाउंडेशनच्या मते, अंतराळ तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. विशेषतः आज अंतराळात माणूस व सामग्री पाठवण्याचा खर्चही कमी झाला आहे. त्यामुळे ही संकल्पना मूर्त रूपात येणे सहज शक्य आहे. 

आता अनेकांना प्रश्न पडेल की, ही सूर्यछत्री अर्थात सनशेड सूर्याच्या उष्णतेमुळे जळून जाणार नाही का? तर याचे उत्तर 'नाही' असे आहे. 



काय आहे लँग्रेज-1 पॉइंट? 

सूर्य व पृथ्वी या दोन्हींच्या आत गुरुत्वाकर्षण आहे. सूर्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पण एका विशिष्ट टप्प्यावर या दोन्हीमधील गुरुत्वाकर्षण एकमेकांना संतुलित करते. याचा अर्थ असा की, या पॉइंटमधून जाणाऱ्या कक्षेत एखादा उपग्रह ठेवला तर तो सूर्य किंवा पृथ्वी या दोघांकडेही खेचला जाणार नाही. सूर्य व पृथ्वी यांत्यातील सरळ रेषेत असेच 5 पॉइंट निश्चित करण्यात आलेत. 



त्याला विख्यात गणितज्ज्ञ जोसेफ -लुई लँग्रेज यांच्या नावावरून लँग्रेस पॉइंट्स असे नाव देण्यात आले आहे. त्यापैकी लँग्रेज-1 हा एक असाच पॉइंट आहे. हा लँग्रेज-1 बिंदू पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर पृथ्वी व सूर्य यांच्यातील 100 वा भाग आहे. लँग्रेज-1 चा फायदा असा आहे की, त्यातून जाणाऱ्या कक्षेत फिरणारी वस्तू (ज्याला आपण हॅलो ऑर्बिट म्हणतो) सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणात लपत नाही. अशा या जादुई ठिकाणी अंतराळ छत्री स्थापन करून पृथ्वीचे संरक्षण करण्याचा संशोधकांचा मानस आहे. 

आशा आहे की, आजचा ब्लॉगही तुम्हाला आवडला असेल. खाली तुम्ही तुमच्या प्रतिक्रियाही नोंदवू शकता किंवा एखाद्या विषयाची विस्तृत माहिती हवी असेल, तर त्याचीही मागणी करू शकता.

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

मृत्यूला हसत सामोरी गेलेली एक वीरांगणा

मागच्या काही ब्लॉगमध्ये आपण विज्ञानकथा वाचल्या. विज्ञानासारखाच इतिहासही अनेक थरारक गोष्टींनी भरलेला आहे. यातील काही शौर्यकथा अक्षरशः अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. चीनच्या चेंग बेनहुआची कथाही अशीच शहारे आणणारी आहे...

 चेंग बेनहुआ एक धीरोदात्त साहसी महिला होती. तिने 1937 साली जपानच्या चीनवरील हल्ल्यावेळी जपान्यांचा निकराने सामना केला. बंदुकीच्या संगीनीने शरीराची चाळणी होण्यापूर्वी तिचे एक छायाचित्र काढण्यात आले होते. मृत्यूच्या काही क्षण अगोदर काढण्यात आलेले तिचे हे हसरे छायाचित्र तिच्या निर्भयतेचे एक ऐतिहासिक उदाहरण ठरले. ते आजही तुम्हा-आम्हा सारख्या असंख्य नागरिकांना जीवन जगण्याचा संघर्ष करण्याचे बळ देते.



चेंग बेनहुआ यांचा हा फोटो जपानच्या एका फोटोग्राफरने काढला होता. या फोटोग्राफरने चेंगचे अंतिम क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. जपानने या युद्धात आपल्या ताब्यात घेतले आणि त्यानंतर तिला तुरुंगात डांबले. ज्या सैनिकांनी तिला पकडले, त्यांनी तिच्यावर असंख्यवेळा बलात्कार केला. पण ती शेवटच्या श्वासापर्यंत डगमगली नाही. 

या छायाचित्रातही चेंग बेनहुआ आपल्या मृत्यूला हसत सामोरे जाताना दिसते. तिने आपले दोन्ही हात आपल्या छातीला घट्ट धरलेत. तिची मान अभिमानाने ऊर भरून यावा अशा पद्धतीने ताठ आहे. ती अत्यंत निडरपणे कॅमेऱ्याच्या पाहताना दिसून येते. तिचा याच पोजचता एक पुतळा चीनच्या नानजिंग शहरात उभारण्यात आला आहे.



नानजिंग शहर दुसऱ्या युद्धातील नरसंहाराचे साक्षीदार बनले होते. येथे जपानी सैनिकांनी 3 लाखांहून अधिक चिनी पुरुष व महिलांचा रक्तपात केला होता. चेंग बेनहुआची हत्या 1938 साली करण्यात आली. तेव्हा ती अवघ्या 24 वर्षांची होती. त्यानंतर वर्षभराने या युद्धाचे लोन संपूर्ण यूरोपपर्यंत पसरले. 

चिनी इतिहासकार व संग्रहालय संचालक फॅन जियानचुआन यांनी 2013 मध्ये पीपल्स डेलीला सांगितले की, या भीषण युद्धात मारल्या गेलेल्या लाखो लोकांमध्ये चेंग बेनहुआ ही सर्वात शक्तिशाली व्यक्ती होती. तिने स्वतःची ऐतिहासिक छापी सोडली. त्यामुळे ती आजही सर्वात जास्त आदरास पात्र ठरते. 

कोण होती चेंग बेनहुआ?

चेंग बेनहुआविषयी इंटरनेटवर फार कमी माहिती उपलब्ध आहे. तिची माहिती शोधूनही सापडत नाही. पण उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, चेंग बेनहुआचा जन्म 1914 साली चीनच्या अनहुई प्रांतातील हेक्सियान काउंटीतील गाओशियांग गावात झाला. तिच्या आईचे आडनाव लियांग होते. ती तिच्या आई-वडिलांच्या 4 भावंडांपैकी तिसरी होती. तिला 1 सावत्र भाऊही होता. माध्यमिक शिक्षण घेताना बेनहुआने चिनी स्काउट्सच्या 1194 रेजिमेंटमध्ये खडतर परिस्थितीचा सामना करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तिने दुसऱ्या महायुद्धातील जपानविरोधातील युद्धात सक्रीय सहभाग घेतला होता. 



चेंग बेनहुआ 1937 च्या उत्तरार्धात चिनी सेनानी लिऊ झियी यांच्या संपर्कात आली. पण दुर्दैवाने लिऊ 1938 च्या सुरुवातीला जपानच्या हल्ल्यांत मारले गेले. त्यानंतर एप्रिल 1938 मध्ये कमांडर कोइची यामाशिता यांच्या नेतृत्वातील जपानच्या 6 व्या डिव्हिजनच्या 13 व्या रेजिमेंटने चेंग बेनहुआला ताब्यात घेतले. त्यानंतर तिचा अतोनात छळ करण्यात आला. तिच्यावर शेकडोवेळा सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी जपानी सैनिकांनी दुसऱ्या एका ठाण्यावर स्थलांतरीत होण्याचे आदेश मिळाले. पण तत्पूर्वी, त्यांनी चेंग व तिच्या सहकारी लढवय्यांना बंदुकीच्या संगीनीने भोसकून ठार मारले.

सावित्रीमाईंचे ऐतिहासिक कार्य 

चेंग बेनहुआ सारख्या असंख्य महिला इतिहासात होऊन गेल्या. भारतात सावित्रीबाई फुले सारख्या महनीय व्यक्ती होऊन गेल्या. त्यांनी जात व लिंगावर आधारित भेदभाव व अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. भारतात जेवढे महापुरुष झाले, त्या सर्वांविषयी एखाद दुसरा वाद आहे. पण महिलांना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या सावित्रीमाई फुले यांच्याबाबत मात्र एकही वाद नाही. किंबहुना असल्या वादाच्याही कित्येक पुढे जाऊन त्यांनी त्याकाळी उत्तमोत्तम काम केले. 



महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी जवळपास पावणे दोनशे वर्षांपूर्वी जे महान कार्य केले, ते काळाच्याही पुढे होते. या दाम्पत्याने त्या काळात दाखवलेली हिंमत, घेतलेली भूमिका व त्यासाठी केलेला त्याग आजही कुणी करण्याचे धाडस करू शकत नाही. त्यासाठी या दोन्ही महापुरुषांना मनापासून वंदन केलेच पाहिजे!

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

ब्रह्मांडातील विशाल तरंगता तलाव



जलं ददाति जीवनम् जलं विना मरणम्...अर्थात पाणी असेल तर जीवन व नसेल तर मरण... पाणी हा विषयी कितीही चावून चोथा झाला असला तरी त्याबद्दलचे आपले अज्ञान पदोपदी दिसून येते. 

आपले ब्रह्मांड अनेक गुपितांनी भरलेले आहे. आपली पृथ्वी सौरमंडळाचा एक सदस्य आहे. आपल्या ब्रह्मांडाचा एक किरकोळ हिस्सा... हे ब्रह्मांड पृथ्वीवरून दिसणाऱ्या आकाशगंगेचा एक हिस्सा आहे. लहानपणापासून आतापर्यंत आपण विज्ञान, पृथ्वी, आकाश, चंद्र व सूर्याचे किस्से ऐकलेत. संशोधकांच्या मते, जगात केवळ आपणच नाही. आपल्यासारखे अनेक ब्रह्मांड आहेत. कारण, आकाश अनंत आहे. त्याला कोणतेही पलिकडचे टोक नाही. आपण त्याला अद्याप पूर्णपणे पाहिले आहे किंवा ते आपल्याला फारसे समजलेही नाही.   https://bhagyadarshi.blogspot.com/

त्यानंतरही आपण आपल्यासारखे दुसरे कोणतेही ब्रह्मांड नाही असा दावा कसे काय करू शकतो? काही संशोधक या प्रश्नाचे उत्तर पाणी असे देतात. त्यांच्या मते ब्रह्मांडात दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी पाणी नाही. पण त्यांचा हा समज आता चुकीचा ठरला आहे. कारण, आजवर मनुष्याला माहिती असलेल्या ब्रह्मांडातील पाण्याचा सर्वात मोठा साठा पृथ्वीपासून 12 अब्ज प्रकाश वर्ष अंतरावर आढळला आहे. विशेष म्हणजे हा साठा पृथ्वीवरील एकूण जलसाठ्याच्या तुलनेत तब्बल 140 ट्रिलियन पट मोठा आहे. 



खगोलशास्त्रज्ञांच्या 2 चमूंनी संयुक्तपणे तरंगता जलाशय शोधून काढला आहे. पॅसिफिक महासागर पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर असल्याचे आपण मानतो. पण पृथ्वीवर जेवढ्या नद्या, तलाव, सरोवरे व समुद्र किंवा महासागर आहेत, ते सर्व मिळून ब्रह्मांडात आढळलेल्या या तरंगत्या जलाशयापुढे केवळ पाण्याचा एक थेंब आहे. 

ब्रह्मांडाच्या एखाद्या कोपऱ्यात आपल्यासारखेच सजिवसृष्टी असल्याचा दावा मानवजातीने आतापर्यंत अनेकदा केला आहे. त्यांच्या या दाव्याला या संशोधनामुळे बळ मिळाले आहे. नासा व इस्रो सारख्या अंतराळ संस्था अंतराळात पाण्याचा शोध घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा  खर्च करत आहेत. त्यामु्ळे क्वासर (एक विशाल ब्लॅकहोल) लगत पाण्याचा हा विशालकाय ढग आढळणे, हे खगोल विज्ञानाचे एक मोठे यश आहे.   https://bhagyadarshi.blogspot.com/

संशोधकांच्या मते, क्वासरमधून प्रचंड ऊर्जा बाहेर पडत आहे. या ब्लॅकहोलच्या मध्यभागी वायू व धूळ कोसळत आहे. या कृष्णविवरातून सूर्यापेक्षा तब्बल 22 पट अधिक ऊर्जा बाहेर पडते. 



दुसरीकडे, संशोधकांनी केवळ पाणी अस्तित्वात असणाऱ्या एका ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 100 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. हा ग्रह पाण्याच्या एका जाड थराने झाकलेला आहे. त्याची रचना गुरू व शनीच्या काही चंद्रांसारखी आहे. पण त्याचा आकार व वस्तुमान पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पण त्याच्या ताऱ्यापासून त्याचे अंतर फार कमी असल्यामुळे तिथे जीवसृष्टी अस्तित्वात येण्याची कोणतीही शक्यता नाही. TOI-1452 b हा एक एक्सोप्लॅनेट आहे, जो ड्रॅको नक्षत्रात असलेल्या बायनरी सिस्टीममधील दोन लहान तार्‍यांपैकी एका तार्‍याभोवती फिरतो.

संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने या ग्रहाचा शोध लावला. त्याचे नेतृत्व युनिव्हर्सिटी डटी मॉन्ट्रियल येथील पीएचडी विद्यार्थी व एक्सोप्लॅनेट्सवर संशोधन करणाऱ्या संस्थेने लावला. नासाच्या TESS अंतराळ दुर्बिणीच्या माध्यमातून या ग्रहाचा शोध लावला.  https://bhagyadarshi.blogspot.com/

पृथ्वीशिवाय 17 ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व

जीवसृष्टीसाठी आवश्यक असणार्‍या मूलभूत घटकांमध्ये पाण्याचा समावेश होतो. त्यामुळे आपल्या सौरमालिकेतील किंवा बाहेरील ग्रहांबाबतचे संशोधन करत असताना तिथे पाण्याचे अस्तित्व आहे का? हे तपासून पाहिले जाते. नासाच्या संशोधनानुसार, पृथ्वीशिवाय आणखी 17 ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व आहे. हा डेटा मानवासाठी इतर ठिकाणी जीवसृष्टी निर्माण करण्याकरिता अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. तूर्त, आपल्या सौरमालेत केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी अस्तित्वात आहे.

आपल्या सौरमालेसारखे विविध ग्रह असलेल्या अनेक सौरमालिका अंतराळात आहेत. अशा प्रकारच्या सौरमालिकेतील अनेक ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते असा संशोधकांचा दावा आहे. नासाच्या मते, पृथ्वीसारख्या अन्य 17 ग्रहांवर पाणीसाठा आहे. हे सर्व ग्रह आपल्या सौरमालेबाहेरील आहेत. काही ग्रहांवर बर्फाळ महासागर, काहींच्या पृष्ठभागावर द्रवरूप महासागर, तर काहींच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली महासागर आहेत असा दावा नासाने यासंबंधी केला आहे.   https://bhagyadarshi.blogspot.com/

शास्त्रज्ञांनी या 17 ग्रहांवर असलेल्या गिझरचा सखोल अभ्यास केला आहे. जमिनीवर अशी छिद्रे असतात जिथून कारंज्यासारखे पाणी बाहेर पडते. या छिद्रांना वैज्ञानिक भाषेत गिझर असे म्हणतात. पाणी गोठल्यामुळे किंवा वितळल्यामुळे बर्फाळ महासागराच्या पृष्ठभागाखाली दाब निर्माण होतो. अशा स्थिती जमिनीतील पाणी कारंजे सारखे बाहेर वाहायला लागते. कधीकधी हे कारंजे 100 मीटर उंच असतात. विशेष म्हणजे हे 17 ग्रह पृथ्वीच्या जवळपास आहेत. येथे पुरेसा प्रकाश, पाणी आणि बर्फ आहे. दगड देखील आहेत. या खडकांची खरी रचना कशी आहे, यावर सध्या संशोधन सुरू आहे.



आता वाचू पाण्याच्या थेंबाची कथा...

गिसान नावाचे एक झेन गुरू होते. ते अन्य झेन गुरूंप्रमाणे केवळ पुस्तकी ज्ञानातून अध्यात्मिक शिकवण न देता, जगण्याच्या रोजच्या अनुभवातून शिष्यांना शिकवण देण्यासाठी प्रसिद्ध होते.

एके दिवशी काय झाले? ते आंघोळीला बसणार इतक्यात त्यांच्या लक्षात आले की पाणी जरा जास्तच गरम आहे. त्यांनी एका शिष्याला बोलावले आणि सांगितले की जरा थंड पाण्याची एक बादली भरून आण आणि हे गरम पाणी थोडे कोमट कर, ते फारच गरम आहे.  https://bhagyadarshi.blogspot.com/

शिष्य गेला व त्यांनी थंड पाण्याची बादली भरून आणली. त्याने गरम पाण्यामध्ये थंड पाणी ओतले आणि गिसान यांना आंघोळ करता येईल इतकं ते कोमट केलं. हे काम झाल्यावर त्यांनं बादलीतलं उरलेलं थंड पाणी स्नानगृहात ओतून टाकलं.

त्या क्षणी गिसान, त्या शिष्यावर अज्ञानी, मूर्ख माणसा असं म्हणत ते जोरात खेकसले. एकदम धक्का बसलेल्या त्या शिष्याकडे बघत ते पुढे म्हणाले, उरलेलं पाणी तू झाडांना का नाही दिलंस. पाण्याचा एक थेंब देखील वाया घालवण्याचा अधिकार या मंदिरामध्ये तुला कोणी दिला?

असं म्हणतात, त्याक्षणी त्या शिष्याला झेनचा साक्षात्कार झाला. त्यानं आपलं नाव बदललं आणि तेकीसुई असं नवं नाव धारण केलं. तेकीसुईचा अर्थ आहे पाण्याचा थेंब!



मॉरल ऑफ द स्टोरी

"पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. पण त्यापैकी बहुतांश भाग समुद्र व महासागरांत सामावलेला आहे. उरलेल्या 2.5 टक्के पाण्यापैकी केवळ 1 टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे. हे पाणी म्हणजेच आपले जीवन आहे. ते जोवर उपलब्ध असेल, तोवरच पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व असेल."


बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

ब्रह्मांडातील 'ओरडणारे भूत' अन् 'झपाटलेले झाड'


गावी लहानपणी कधी-कधी रात्रीचे भूताखेतांचे किस्से मस्त रंगायचे. माझा भूतांवर विश्वास नाही. पण काही जण खोटे बोलत नाहीत हे माहिती होते. त्यांना थापा मारायची सवय नाही हे सर्वांना माहिती होते. त्यामुळे असे लोक जेव्हा भूताचे अनुभव सांगायचे तेव्हा त्यांना खोटे ठरवणे योग्य वाटायचे नाही. https://bhagyadarshi.blogspot.com/

ज्याची त्याची श्रद्धा कपूर म्हणून मी हे किस्से ऐकायचो... 😄

असे खूप किस्से ऐकले.

त्यात एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे सर्वांना भूत रात्रीच दिसते.

असे का?

सोडा...(बाटलीतला नाही) हा आपला विषय नाही.. असाही ब्रह्मांडाच्या पसाऱ्यात अंधारच शाश्वत आहे...

आज हा विषय आठवण्याचे कारण म्हणजे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) ब्रह्मांडात नुकतेच एक खरेखुरे भूत आढळले आहे... ते ही तोंड आ वासलेले...

आपले ब्रह्मांड अनंत रहस्यमय गोष्टींनी भरलेले आहे. आपल्या कधी कधी या ब्रह्मांडाचे खूप सुंदर रूप दिसते. पण कधी कधी त्याचे आक्राळविक्राळ रुपही नजरेस पडते. नासाला ब्रह्मांडाचे हेच आक्राळविक्राळ रुप नजरेस पडले आहे. नासाने काढलेला एक फोटो जेवढा सुंदर आहे, तेवढाच भितीदायकही आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/



2 मोठे डोळे अन् तोंड वासलेले भूत

वास्तविक, जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या (JWST) माध्यमातून नासाला दिसलेले हे दृश्य एखाद्या 'डीप-स्पेस ब्लॉब मॉन्स्टर' अर्थात एखाद्या भितीदायक भूत किंवा राक्षसासारखे आहे. या फोटोत एक प्रचंड आकाराची धुळीची आकाशगंगा दिसत आहे. ती दरवर्षी शेकडो ताऱ्यांना जन्मास घालत आहे. तिचा आकार पाहून ती फारच भितीदायक वाटते. तिच्याकडे बारकाईने पाहून ही आकाशगंगा म्हणजे 2 मोठे डोळे असणारा व तोंड वासलेला ब्रह्मांड राक्षसच दिसते. https://bhagyadarshi.blogspot.com/

केव्हा अस्तित्वात आली ही गॅलक्सी?

ऑस्टिनच्या टेक्सास विद्यापीठाच्या खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष्य या आकाशगंगेने स्वतःकडे वेधून घेतले. त्यानंतर त्यांनी जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या डेटाचे विश्लेषण केले. त्यात AzTECC71 नामक ही आकाशगंगा जवळपास 900 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्याचे निष्पन्न झाले. बारकाईने पाहिल्यास ही आकाशगंगा एखाद्या ओरडणाऱ्या भूतासारखी दिसते. 



एक खराखुरा राक्षस 

या शोधामुळे शास्त्रज्ञांची सुरुवातीच्या विश्वाबद्दलची समज बदलू शकते. कारण त्यांना पूर्वी ही राक्षसी आकाशगंगा छोटीशी असल्याचे वाटले. पण नंतर ती जवळपास 3 ते 10 पट जास्त दूरवर पसरल्याचे स्पष्ट झाले. टेक्सास विद्यापीठाचे संशोधक जेड मॅककिनी यांनी सांगितले की, या आकाशंगेला खराखुरा राक्षस म्हटले जाऊ शकते, कारण ती एखाद्या थेंबासारखी दिसत असली तरी ती दरवर्षी शेकडो नव्या ताऱ्यांना जन्म देत आहे. या घटनेमुळे आकाशगंगेची एक मोठी संख्या अजूनही आपल्या नजरेपासून दूर असल्याचेही या संशोधनामुळे स्पष्ट झाले आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/

जाता जाता एका झपाटलेल्या झाडाची गोष्ट...

एक दौलतकपूर नावाचे राज्य होते. दौलतसिंह नामक राजा त्यावर राज्य करत होता. राजा आपल्या प्रजेत लोकप्रिय होता. लोकही त्याच्यावर अमाप प्रेम करत होते. एकेदिवशी एक गिधाड आकाशात झपाटलेल्या झाडाचे बीज घेऊन उडत होते. हे गिधाड रौनकपुराहून उडताना त्याच्या तोंडातून हे बीज रौनकपूरच्या मध्यभागी पडले. 

बी झपाटलेले होते, त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्याचे रोपट्यात रुपांतर झाले. तिथल्या स्थानिक रहिवाशांनी जेव्हा ते पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. कारण, या रोपाचा रंग काळा होता. हे एखादे जंगली गवत किंवा दुर्मिळ वनस्पती असावी असे त्यांना वाटले. दुसऱ्या दिवशी हे रोप खूप मोठे झाले. एका दिवसात हे रोप एवढे कसे वाढले या विचाराने जनता अधिकच गोंधळली.

अखेर तिसर्‍या दिवशी त्या रोपाचे झाड झाले. वेळ निघून गेला आणि वेगाने वाढणार्‍या या वनस्पतीवर विचार करून लोकही काळजीत पडले. त्यांनी हे प्रकरण राजाकडे नेले. या जादुई झाडाची माहिती मिळताच राजा तत्काळ झाडापाशी पोहोचला. एका काळ्या रंगाच्या रोपाचे 3 दिवसांत झाडात रूपांतर झाल्यामुळे राजालाही आश्चर्य वाटले. https://bhagyadarshi.blogspot.com/

चौथ्या दिवशी राजा स्वतः त्या झाडाजवळ पोहोचला. तोपर्यंत ते झाड खूप मोठे झाले होते. ते एवढ्या वेगाने वाढले होते की, कुणाचाही विश्वास बसत नव्हता. या झाडाचा रंग काळा असल्यामुळे राजाला हा प्रकार जादुटोण्याचा असावा असा संशय आला. हाच विचार करून राजाने घोषणा केली की, जो कुणी या झाडाचा नाश करेल त्याला 1 हजार सोन्याची नाणी बक्षीस म्हणून देण्यात येतील. एवढेच नाही तर राजाने या झाडाचा नायनाट करणाऱ्याला आपला उत्तराधिकारी बनवण्याचीही घोषणा केली.

एवढी मोठी घोषणा ऐकून सर्वांनीच झाड तोडण्याचा विचार सुरू केला. राजाच्या हुशार मंत्र्यांनीही आपापल्या परीने प्रयत्न केले, पण कुणीही झाड नष्ट करू शकले नाही. एकाने या झाडाभोवती आग लावली. तर दुसऱ्याने ते झपाटलेले झाड हत्तीने ओढून पाडण्याचा प्रयत्न केला. पण झाड जागचे हलले नाही.

हे पाहून लोक घाबरले... हे झाड भुताटकीने झपाटलेले आहे अशी त्यांची खात्री पटली. तेव्हा त्या गावातील एका हुशार माणसाच्या कानावर राजाची घोषणा पडली. त्यानंतर लगेच तो व्यक्ती आपल्या गुरूंकडे गेला. आणि त्या झपाटलेल्या झाडाशी संबंधित रहस्य जाणून घेतले.

गुरुजींनी आपल्या शक्तीने त्या विचारले, "तुला झाड नष्ट करायचे आहे का?"

त्या हुशार व्यक्तीने उत्तर दिले, “हो, गुरुजी. सर्वजण त्याच्यामुळे परेशान आहेत.”

गुरुजींनी सांगितले की, त्याचा नायनाट करण्याचा एकच मार्ग आहे. त्यासाठी त्या झाडाभोवती मीठ टाकावे लागेल.

ही युक्ती कळताच ती व्यक्ती ताबडतोब राजाकडे गेली आणि म्हणाली की, तुम्हाला या झाडाभोवती मीठ टाकावे लागेल. असे केल्यानेच हे झाड मरेल. राजाने आपल्या सैनिकांना तसे करण्यास सांगितले. सैनिकांनी मिळून झाडाभोवती भरपूर मीठ ओतले.  https://bhagyadarshi.blogspot.com/

मीठ घातल्यानंतर अवघ्या एका दिवसातच झाडाचा आकार काहीसा कमी झाला. त्यानंतर 5 व्या दिवशी झाड अगदी लहान झाले.  त्यानंतर ते वाळून नष्ट झाले. त्या हुशार माणसाची युक्ती यशस्वी ठरली होती. त्यामुळे राजाने प्रसन्न होऊन त्याला 1 हजार सोन्याच्या नाण्याची थैली व एक सनद दिली. या सनदीवर राजाच्या मृत्यूनंतर हा व्यक्ती त्याचे सिंहासन सांभाळेल असे नमूद होते. राजाच्या या घोषणेमुळे हा हुशार व्यक्ती आनंदाने आपल्या घरी परतला...

मॉरल ऑफ द स्टोरी - जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. फक्त संयम अन् ती समजून घेण्याची गरज असते.  https://bhagyadarshi.blogspot.com/

सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

तुम्ही नरकाचा दरवाजा पाहिलाय का?

स्वर्ग अन् नरक या दोन ध्रुवांसारख्या 2 टोकांच्या गोष्टी आहेत. स्वर्ग पुण्यवंतांना प्राप्त होणारा आनंदमय लोक, तर नरक म्हणजे पापी माणसांना मिळणारा दुःखमय लोक... स्वर्ग हा ऊर्ध्वलोक म्हणजे पृथ्वीच्या वर आहे. तर नरक हा अधोलोक म्हणजे पृथ्वीच्या खाली आहे. काही धार्मिक परंपरांमध्ये स्वर्ग हे देवांचे वसतिस्थान, तर नरक हे कथित दुष्ट शक्तींचे निवासस्थान मानले जाते. स्वर्ग हा आनंदमय असल्यामुळे प्रकाश हे त्याचे प्रतीक आहे. याऊलट नरक हे काळोखाचे प्रतीक मानले जाते. https://bhagyadarshi.blogspot.com/



स्वर्ग व नरक या दोन्ही अवस्था मृत्यूनंतर पाहता येतात असे मानले जाते. अनेकजण स्वतःच्या संसाराचाही स्वर्ग करतात. तर काही जण जीवंतपणेच नरकयातना भोगतात. वस्तुतः स्वर्ग व नरक या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत. त्या अद्याप कुणीही पाहिल्या नाहीत. पण आपल्या पृथ्वीवरच नरकाचा दरवाजा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? होय, पृथ्वीवर नरकाचा दरवाजा असून, तो लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/

आता तुम्ही म्हणाल... हा दरवाजा पृथ्वीवर असेल, तर तो आतापर्यंत आम्हाला कसा माहिती झाला नाही? चला तर मग आज आपण पृथ्वीवरील नरकाच्या दरवाजाची माहिती पाहू... 



पृथ्वीवरील नरकाचा दरवाजा तुर्कमेनिस्तानात आहे. अश्गाबात शहरापासून 160 मैल अंतरावरील काराकुम वाळवंटात एक मोठा खड्डा आहे. हा खड्डा जवळपास 230 फूट रुंद आहे. त्यात मागील 50 वर्षांपासून सतत आग धुमसत आहे. त्यामुळे या खड्ड्याला नरकाचे मुख किंवा नरकाचे द्वार असे मानतात. आता तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींनी हा खड्डा लवकरात लवकर बुजवण्याचे आदेश दिलेत. या खड्ड्यातून निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदुषणात वाढ होत आहे. त्याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्यामुळे नरकाचे हे दार बंद केले जात आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/

या खड्ड्यात दुसऱ्या महायुद्धानंतर आग लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनचे मोठे हाल सुरू झाले. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना तेल व नैसर्गिक वायूची नितांत गरज होती. त्याचवेळी तेथील वाळवंटात उत्खनन सुरू झाले. त्यात नैसर्गिक वायू सापडला. पण कालांतराने तेथील जमीन पाण्याखाली गेली. त्यामुळे तिथे मोठे खड्डे तयार झाले. पुढे सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि तुर्कमेनिस्तान हा स्वतंत्र देश म्हणून अस्तित्त्वात आला. 

या खड्ड्यांतून मिथेन वायूची गळती झपाट्याने होत होती. त्यामुळे वातावरणाचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून या खड्ड्यांना आग लावण्यात आली. या खड्ड्यांतील गॅस संपल्यानंतर ही आग विझेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. मागील 50 वर्षांपासूनही ही आग आजही धगधगत आहे. हा एक दावा आहे. त्याचा कोणताही पुरावा नाही. https://bhagyadarshi.blogspot.com/



याविषयी अजून एक दावा केला जातो. तो असा... सोव्हिएत इंजिनिअर्सचा एक समूह अक बुगदे जिल्ह्यात खनिज तेल उत्खननार्थ आला होता. त्यांनी ऑईल रिग सुरू केली, पण जमीन भुसभूशीत निघाली आणि अख्खी रिग जमिनीत धसली. रिग जमिनीच्या पोटात गडप झाली, पण एकही माणूस दगावला नाही. हा चमत्कारच होता. रिग गडप झाली तिथे अर्धे क्रिकेटचे मैदान मावेल एवढा म्हणजे जवळपास 70 टक्के खड्डा तयार झाला. https://bhagyadarshi.blogspot.com/

ऑईल रिग्जमध्ये अशा दुर्घटना घडण्यात कोणतेही नवल नाही. काराकुम वाळवंटात असे एक-दोन अपघात घडले. त्यानंतर हे खड्डे कधी वाळू, तर कधी पाण्याने भरून गेले. पण येथे एक नवाच प्रश्न निर्माण झाला. खड्ड्यामुळे एका वायूसाठ्याचे तोंड उघडले गेले. त्यातून मिथेन हा ज्वलनशिल वायू बाहेर पडू लागला. हे लिकेज असेल ठेवले, तर त्यामुळे काहीतरी मोठे अनुचित घडण्याची भीती होती. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी या ठिकाणी फ्लेयरिंग करण्याचे ठरले. 

फ्लेयरिंग म्हणजे वायूचा काही भाग जाळून नष्ट करणे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही पद्धत वादग्रस्त आहे. पण त्याकाळी ही पद्धत सर्रासपणे रूढ होती. सामान्यतः आठवडाभर फ्लेयरिंग चालू राहते. मग विझते. त्यानुसार तेथील अधिकाऱ्यांनी क्रेटर पेटवला. पण सर्व अंदाज चुकले. हा क्रेटर आजही 50 वर्षांपासून सातत्याने धगधगत आहे. https://bhagyadarshi.blogspot.com/



प्रत्येक संकटात काही चांगले शोधणारी माणसे असतात. अमेरिकेतील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (microbiologist) व अंतराळ जैवशास्त्रज्ञ (astrobiologist) यांना अशा वातावरणातील सूक्ष्म जीवांचा अभ्यास करण्याची हुक्की आली. परग्रहांवर कुठे सजीवसृष्टी असेल तर ती कशा प्रकारची असेल याचा अंदाज बांधण्यासाठी त्यांना पृथ्वीवरील असा टोकाच्या वातावरणातील जीवांचा म्हणजे एक्स्ट्रीमोफाईल्सचा अभ्यास करणे गरजेचे वाटले. त्यानुसार यलोस्टोन अर्थात अंटार्टिकासह या क्रेटरमध्येही हा अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. https://bhagyadarshi.blogspot.com/

पण या क्रेटरमध्ये उतरून तेथील मातीचे नमुणे आणणार कोण? असा मोठा प्रश्न उभा राहिला. या ठिकाणी नॅशनल जिओग्राफिक चॅनेल (National Geographic Channel) धावून आले. व्यावसायिक संशोधक असणाऱ्या जॉर्ज कोरोनीस यांनी हे आव्हान स्वीकारले. जॉर्जला वादळे, चक्रीवादळे व ज्वालामुखी अशा विविध संकटांचा सामना करण्याचा चांगला अनुभव होता. त्याने जवळपास 2 वर्षे हे क्रेटर सर करण्याचा सराव केला. क्रेटरमध्ये कोणत्या प्रकारचे अॅल्युमिनिअमचे कपडे घालावेत, कशा प्रकारचा दोरखंड वापरावा यावर बराच काथ्याकूट झाला. सर्व तयारी करूनही जॉर्जला ही मोहीम फत्ते करण्यासाठी केवळ 17 मिनिटांचा वेळ मिळणार होता. 



पण जॉर्जने या कालावधीतच आपली मोहीम फत्ते केली. त्याने या नरकाच्या दरवाजाच्या तळाशी जावून माती आणली. या मातीचा अभ्यास केल्यानंतर त्यात काही विरळ बॅक्टेरिया सापडले. यामुळे परग्रहावरील अशा वातावरणात कोणत्या प्रकारची सजीवसृष्टी असेल याचा काहीसा अंदाज संशोधकांना बांधता आला. https://bhagyadarshi.blogspot.com/

आता जाता - जाता पृथ्वीवरील स्वर्गही पाहूया...

इंडोनेशियाची अनेक बेटे आहेत, त्यापैकी एका बेटाला ‘पृथ्वीवरील शेवटचा स्वर्ग’ (लास्ट पॅराडाईज ऑन अर्थ) असे म्हटले जाते. या बेटाचे नाव ‘राजा अम्पत’ असे आहे. हे बेट त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. याशिवाय तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीसाठीही ते विख्यात आहे.



मॅक्स एम्मर नाक डच माणसाने या बेटाचा शोध लावला. दुसर्‍या महायुद्धात सैन्यात सहभागी झालेल्या त्याच्या घर मालकाकडून मॅक्सला या बेटाची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने इंडोनेशिया गाठले व या बेटाचा शोध सुरू केला. जवळपास 4 महिने त्याने हे बेट शोधले. यासाठी त्याने स्थानिक मच्छीमारांची मदतही घेतली. अखेर, पश्‍चिम पापुआ प्रांताजवळ त्याला हे ‘राजा अम्पत’ बेट सापडले. याठिकाणी असलेली थक्‍क करणारी सागरी जैवविविधता आणि तुलनेने दुर्गम स्थानामुळे लोक राजा अम्पत बेटाला ‘पृथ्वीवरील शेवटचा स्वर्ग’ मानले जाते. 

या ब्लॉगची सुरुवात कुठून झाली आणि आपण कुठपर्यंत पोहोचलो. असो, दिवानोंकी यह बाते दिवाने ही जानते है…

https://bhagyadarshi.blogspot.com/

संदर्भ - मायबोली, नॅशनल जिओग्राफिक आदी...

रविवार, १० डिसेंबर, २०२३

पृथ्वी 1 सेकंद थांबली तर.. कधी विचार केलाय?



पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते आणि यामुळे पृथ्वीवर दिवस अन् रात्र होते हे आपल्या सर्वांनाच ठावूक आहे. वसुंधरेच्या या फिरण्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. त्याचा आनंद आपण सर्वजणच घेत असतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, पृथ्वीने क्षणभर आपले फिरणेच बंद केले तर काय होईल? पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर म्हणजे आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल?... डोक्याला हात लावला ना? चला तर मग जाणून घेऊया, पृथ्वीने 1 सेकंद स्वतःभोवती फिरणे थांबवले तर काय होईल या प्रश्नाचे उत्तर.... https://bhagyadarshi.blogspot.com/

आपला निळा ग्रह अर्थात पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते. ती 23 तास 56 मिनिटे व 4.1 सेकंदांत स्वतःची प्रदक्षिणा पूर्ण करते. यामुळे पृथ्वीच्या एका भागावर दिवस व दुसऱ्या बाजूला रात्र असते. अमेरिकेचे विख्यात खगोलशास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन यांनी पृथ्वीने 1 सेकंद फिरणे बंद केले तर काय होईल यावर मार्मिक भाष्य केले आहे.

वेगात धावणाऱ्या कारचा अपघात झाला तर...

टायसन सांगतात की, पृथ्वीने एका सेकंदासाठी आपल्या अक्षावर फिरणे बंद केले तर अत्यंत भयंकर परिस्थिती उत्पन्न होईल. आपण सर्वजण पृथ्वीसोबत पूर्वेकडे ताशी 1674 किलोमीटर वेगाने पुढे जात आहोत. म्हणजे तिच्यासोबत आपणही फिरत आहोत. त्यामुळे पृथ्वीचे 1 सेकंद थांबणे आपल्यासाठी सजीवसृष्टी नष्ट करणारे ठरणार आहे. टायसन याविषयी एका कार अपघाताच्या उदाहरणाद्वारे समजावून सांगतात. ते म्हणतात की, पृथ्वीने क्षणभर स्वतःभोवती फिरणे थांबवले तर वेगाने जाणाऱ्या कारचा अपघात झाल्यासारखी स्थिती उत्पन्न होईल. कारमध्ये बसलेले लोक अपघात झाल्यानंतर जसे झटकन पुढे फेकल्या जातात, तसेच ते सीटवरून वेगाने पुढे फेकले जातील. https://bhagyadarshi.blogspot.com/




एका भागात अंधार दुसऱ्या भागात उजेड 

लोक उंच इमारतीतून खाली वेगाने आपटतील. हे दृश्य पाहणे खूपच भयावह असेल. ABC च्या रिपोर्टनुसार, पृथ्वी अचानक थांबली तर आपल्या वसुंधरेचा बहुतांश भाग नष्ट होईल. अर्ध्या पृथ्वीला सतत सूर्याच्या उष्णतेचा सामना करावा लागेल. याऊलट अर्ध्या ग्रहाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागेल. म्हणजे सूर्याच्या दिशेला असणाऱ्या पृथ्वीच्या एका भागात कायमस्वरुपी दिवस तर सूर्याच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या दुसऱ्या भागात कायमस्वरुपी अंधार असेल. पृथ्वीवर काही भागात कायम सूर्योदय व सूर्यास्थाची स्थिती असेल. काही भागात वर्षभर पाऊस पडेल. तर काही भागात कायमस्वरुपी दुष्काळस्थिती निर्माण होईल, असाही दावा या प्रकरणी केला जातो. https://bhagyadarshi.blogspot.com/




मोठमोठे डोंगर उन्मळून पडतील 

पृथ्वीवरील या विचित्र स्थितीचा फटका बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला बसेल. मानवासह संपूर्ण सजीवसृष्टी संकटात येईल. या स्थितीत नेमके काय होईल? याची कल्पना न केलेली बरी. पृथ्वीने अचानक फिरणे थांबवल्यास वेगवान वादळे निर्माण होतील. मोठ्या व धोकादायक वादळांचा वेग ताशी 200 ते 300 किलोमीटर एवढा असतो. या स्थितीत पृथ्वीने फिरणे थांबवले तर एक भयंकर वादळ निर्माण होईल. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वच वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडून जातील. मोठे डोंगरही उन्मळून पडतील. महासागरांचे पाणी संपूर्ण पृथ्वीवर पसरेल. https://bhagyadarshi.blogspot.com/

आता पाहूया पृथ्वीची माहिती... 

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते. त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. या अक्षाला पृथ्वीचा आस असेही म्हणतात. हा आस दक्षिणोत्तर असून, उत्तरेकडे तो साधारणतः ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. समजा तुम्ही ध्रुव ताऱ्यावर जावून पृथ्वीकडे पाहिले, तर ती तुम्हाला घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसेल. 

पृथ्वी स्वतःभोवती 23 तास 56 मिनिटे व 4.099 सेकंदांत 1 फेरी पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी एका दिवसात म्हमजे 24 तासांत ही 1 फेरी पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. दररोज 8,400 (24 तासांचे सेकंद)/365.25 ( एका वर्षातील दिवस) = 3 मिनिटे 56 सेकंद एवढा असतो. 




पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली?

पृथ्वीची निर्मिती साधारणतः 457 कोटी वर्षांपूर्वी झाली असावी असे मानले जाते. त्यानंतर 453 कोटी वर्षांपूर्वी तिच्या उपग्रहाने म्हणजे आपल्या चंद्राने पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे सुरू केले. पृथ्वीचा व्यास 12,753 किलोमीटर एवढा आहे. सूर्यापासूनच तिचे अंतर सामान्यतः 14,95,97,890 किलोमीटर एवढे आहे. पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर सजीवसृष्टी नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे पृथ्वी स्वतः एक मोठे चुंबक आहे. त्यामु्ळे तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाकडे वळले जातात. 

तर मग पृथ्वीची इत्यंभूत माहिती जाणून घेताना तुम्हाला पृथ्वी क्षणभर थांबली तर किती भयंकर स्थिती उद्भवेल हे समजले का? हो तर मग उद्या पुन्हा अशाच एका रंजक विषयाची माहिती घेऊया...

 वाचा https://bhagyadarshi.blogspot.com/

'व्हॉयझर-1' एलियन्सनी हायजॅक केले का?

अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाचे 'व्हॉयझर-1' (Voyager 1) अंतराळ यान आपल्या सौर मंडळाच्या बाहेर प्रवास करत आहे. 45 वर्षांपूर्वी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. पण, आता हे यान पृथ्वीवर विचित्र संदेश पाठवत आहे. यामुळे शास्त्रज्ञही हैरान झालेत. 'नासा'ने सांगितले की, 'व्हॉयझर' सुरुळीतपणे काम करत आहे. त्याचा अँटेनाही पृथ्वीच्या दिशेने आहे. पण, तो आता आपल्या ठिकाणापासून एका वेगळ्या प्रकारचा संदेश पाठवत आहे. हा डेटा त्याने आतापर्यंत पाठवलेल्या डेटाशी मेळ खात नाही.'



'व्हॉयझर-1' (Voyager 1) पाठवत असलेला डेटा 'नासा'साठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण, याच डेटापासून त्यांना यानाच्या अँटेनाची दिशा पृथ्वीच्या दिशेने असल्याचे समजते. 

'नासा'च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या (nasa jet propulsion laboratory) प्रोजेक्ट मॅनेजर सुजैन डॉड म्हणाल्या की, 'व्हॉयझरने असा व्यवहार करणे अत्यंत गूढ गोष्ट आहे. या यानाची AACS यंत्रणा योग्य ती माहिती पाठवत नाही. ही यंत्रणा यानाच्या ठिकाणाची माहिती पाठवण्यासह विविध प्रकारची काम करते. त्यातील एक काम व्हॉयझरचा अँटेना पृथ्वीच्या दिशेने ठेवण्याचे आहे.' त्या पुढे म्हणाल्या -'AACS अजूनही आपले काम करत आहे. पण, तो एरर डेटा पाठवत आहे. ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.'

यापूर्वीही करण्यात आली आहे व्हॉयझरमध्ये दुरुस्ती 

डॉड पुढे म्हणाल्या -'सध्या या कारणामुळे व्हॉयझरमध्ये कोणतीही समस्या दिसून येत नाही. अँटेना सातत्याने सिग्नल पाठवत आहे. म्हणजे तो सुरुळीतपणे काम करत आहे. त्याची दिशाही पृथ्वीच्या दिशेने आहे.' त्या म्हणाल्या -'इंजिनियर या समस्येवरील तोडगा सॉफ्टवेअरमध्ये बदल करुन काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यात यश आले नाही तर पुढील पर्याय शोधावे लागतील.'

विशेष म्हणजे व्हॉयझरमध्ये बिघाड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये त्याच्या थ्रस्टरमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर दुसरे एक थ्रस्टर तब्बल 37 वर्षांनी सुरू करण्यात आले होते. 

एक संदेश येण्यासाठी लागतात 2 दिवस

'व्हॉयझर-1' 1977 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. त्यानंतर 2012 मध्ये ते आपल्या सौर मंडळातून बाहेर पडले. सध्या ते इंटरस्टेलर अंतराळात प्रवास करत आहे. आपल्या सूर्यमालिकेबाहेर प्रवास करणारी ही मानवनिर्मित पहिलीच वस्तू आहे. सध्या व्हॉयझर पृथ्वीपासून सुमारे 23 अब्ज किलोमीटर दूर आहे. हे अंतर एवढे आहे की 'व्हॉयझर'ने पाठवलेला एक संदेश पृथ्वीपर्यंत येण्यासाठी व येथून त्याच्यापर्यंत संदेश पाठवण्यासाठी तब्बल् 48 तासांचा अवधी लागतो. bhagyadarshi.blogspot.com



केव्हा झाले होते प्रक्षेपण?

व्हॉयझर-1 ((Voyager 1)) आंतरिक्षयान आहे. याचे वजन 722 किलो ग्राम (1590 lb) आहे. ही पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली माणसाने निर्माण केलेली वस्तू आहे. दिनांक 5 सप्टेंबर 1977 रोजी व्हॉयझर-1 ((Voyager 1)) या यानाने पृथ्वीवरून उड्डाण केले. सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडले गेले आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना भेट देणारी हे पहिले यान आहे. bhagyadarshi.blogspot.com

व्हॉयझर-1 ((Voyager 1)) आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वैज्ञानिकांना अपेक्षित असलेल्या कामगिरीच्या कितीतरी पटीने अधिक कामगिरी त्याने पार पाडली आहे. या यानाच्या प्रक्षेपणापूर्वी म्हणजे 20 ऑगस्ट 1977 या दिवशी व्हॉयझर-2 ((Voyager 2) या यानाला अवकाशात पाठविण्यात आले. गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ही अंतराळ यानं सोडण्यात आली होती आणि त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. या यानाचे आयुष्य 5 वर्षे असेल, असे गृहित धरून या मोहिमेची आखणी झाली होती, पण अतिशय आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 37 वर्षांनंतरही हे दोन्ही यान उत्तम कामगिरी बजावत आहेत. bhagyadarshi.blogspot.com

सुरुवातीच्या काळात व्हॉयझर्सनी गुरू व शनी हे ग्रह तसेच त्यांच्या उपग्रहांचा सविस्तर अभ्यास केला. युरेनस आणि नेपच्यून या  ग्रहांना भेट देणारी ही पहिलीच याने ठरली. गुरूच्या वातावरणात सतत प्रचंड उलथापालथ  चालू असते. या वातावरणाची विशेषत: गुरूवर असलेल्या भल्या मोठ्या लाल ठिपक्यांचे तपशीलवार फोटो या यानांनी पृथ्वीवर पाठवली. गुरूला अनेक उपग्रह आहेत. आयो हा त्यापैकी एक. या उपग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर अनेक जागृत ज्वालामुखी आहेत. त्यांचेही फोटो व्हॉयझर्सनी पाठवली आहेत. शनीला असलेली कडी हा वैज्ञानिकांच्याच नव्हे तर सर्वसामान्यांच्याही कुतूहलाचा विषय. त्या कड्यांचेही सुस्पष्ट फोटो आपल्याला या यानांमुळे उपलब्ध झाली आहेत. bhagyadarshi.blogspot.com




व्हॉयझरच आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर ठेवण्यात आलेली एक सोनेरी तबकडी. या तबकडीवर पृथ्वीसंबंधीची बरीच माहिती रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. पृथ्वीवर नेहमी ऐकू येणारे आवाज उदा. पक्ष्यांचा किलबिलाट, धबधब्याचा किंवा रेल्वेचा आवाज यासह जगातल्या सर्वच प्रमुख भाषांमधून दिलेले शुभेच्छा संदेशही या तबकडीवर आहेत. या भाषांमध्ये हिंदी भाषेचाही समावेश आहे. आपली सौरमाला, त्यातले पृथ्वीचे स्थान याचा नकाशाही या तबकडीवर आहे. हा सगळा मजकूर, छायाचित्रे इ. तयार करण्याचे काम ज्या वैज्ञानिकांनी केले त्यात कार्ल सेगन या प्रसिद्ध खगोल वैज्ञानिकाचा समावेश होता. त्याच्या छोट्या मुलाचे बोबडे बोलही या गोल्डन रेकॉर्डवर आहेत. तो म्हणतो- Hello from the children of planet earth! हा सगळा मजकूर / आवाज व्हॉयझरच्या वेबसाईटवर आपल्याला पाहता / ऐकता येतो. bhagyadarshi.blogspot.com

वैज्ञानिकांना अशी (भाबडी?) आशा आहे की भविष्यात कधीतरी व्हॉयझर यान एखाद्या परग्रहावर उतरेल आणि तेथे असलेले मानव ही तबकडी पाहतील / वाचतील आणि पृथ्वीशी संपर्क साधतील. असे खरेच घडेल की नाही याचे उत्तर अर्थातच काळाच्या उदरात दडलेले आहे. एक मात्र निश्चित की व्हॉयझर यान आता अनंताच्या प्रवासाला निघाली आहेत. bhagyadarshi.blogspot.com

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

सोमवारी आकाशात 1 स्फोट अन् गायब होणार चकाकता तारा

bhagydarshi.blogspot.com आपले ब्रह्मांड अनंत गूढ गुपितांनी भरलेले आहे. त्यात आता आणखी एका अनोख्या घटनेची भर पडणार आहे. नव्या घटनेत आकाशातील एक सर्वाधिक चकाकणारा तारा अचानक नाहीसा होणार आहे. या असामान्य घटनेंतर्गत हा सर्वात मोठा व सर्वाधिक तेजस्वी तारा काही क्षणांसाठी नाहीसा होईल. एका उल्केमुळे हे सर्वकाही घडेल. खगोलप्रेमींच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी पर्वणी असणारी घटना येत्या सोमवारी 11 डिसेंबर रोजी रात्री उशिरा घडेल. ती मंगळवारी पहाटेपर्यंत पाहता येईल.



कुठून दिसेल हा अनोखा नजारा?

मध्य आशियाच्या तझाकिस्तान व आर्मेनियापासून तुर्की, ग्रीस, इटली व स्पेनपर्यंत ही घटना पाहता येईल. एवढेच नाही तर मियामी व फ्लोरिडा कीज ते मेक्सिकोच्या काही भागांतही ही घटना दिसेल. शास्त्रज्ञांनी या ताऱ्याला बेटेल्गेयूज (betelgeuse) असे नाव दिले आहे. संशोधक त्याला ओरायन तारकामंडळातील एक लाल विशाल तारा म्हणूनही ओळखतात. या ताऱ्यासमोरून लियोना नामक उल्कापिंड जाईल. लियोना हा मंगळ व गुरू ग्रहाच्या मध्यभागी असणाऱ्या उल्कापिंडांच्या बेल्टमध्ये हळूहळू फिरणारा एक आयाताकृती दगड आहे. 

कसा आहे हा तारा?

ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे, जिने केवळ अवकाश विज्ञानात रस असलेल्या लोकांनाच आकर्षित केले नाही, तर शास्त्रज्ञांचेही लक्ष वेधून घेतले आहे. बेटेल्गेयूज तारा रात्रीच्या आकाशात सर्वात जास्त चमकतो. या ताऱ्याचा स्फोट होणार आहे. त्यानंतर तो सुपरनोव्हात जाण्यास तयार होईल. शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या काही काळापासून या ताऱ्याचा व्यवहार खूपच अनियमित झाला आहे. या ताऱ्याचा व्यास सुमारे 700 दशलक्ष मैलांपेक्षा जास्त असून, तो त्याच्या खास केशरी रंगासाठी ओळखला जातो. खगोलशास्त्रज्ञ याला सर्वात मोठ्या ज्ञात ताऱ्यांपैकी एक मानतात.

संशोधकांची उत्सुकता टोकाला 

खगोलशास्त्रज्ञांना या ग्रहणाद्वारे बेटेल्गेयूज आणि लिओनाची अधिक माहिती गोळा करता येईल. तथापि, हे ग्रहण 15 सेकंदांपेक्षा जास्त राहणार नाही. उल्लेखनीय गत सप्टेंबर महिन्यात स्पॅनिश संशोधकांच्या एका पथकाने ही उल्का जवळपास 34 मैल रुंद व 80 किलोमीटर लांब असण्याचा अंदाज व्यक्त केला होता. उल्कापिंडामुळे संपूर्ण तारा नाहीसा होईल. यामुळे संपूर्ण ग्रहण होईल की त्याचा काही भागच झाकला जाईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जर हे संपूर्ण ग्रहण असेल तर ताऱ्याला पूर्णतः गायब होण्यासाठी किती सेकंद लागतील हे शास्त्रज्ञांना माहिती नाही. त्या स्थितीत हा तारा अवघ्या 10 सेकंदांत पूर्णतः गायब होईल. 

अहो ऐकलं का, उंदीर मांजरीला नव्हे तर केळीला घाबरतो!



उंदीर मांजराला घाबरतो हे सर्वश्रूत आहे. पण, एका संशोधनाद्वारे या पूर्वापार चालत आलेल्या समजुतीला छेद बसला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, "उंदीर मांजराला नव्हे तर केळीला घाबरतो." हे ऐकण्यास काहीसे विचित्र वाटत असले तरी शास्त्रज्ञांना अनावधानाने लागलेल्या एका शोधामुळे हे सिद्ध झाले आहे. संशोधक गरोदर व स्तनदा मादा उंदरावरील नर उंदराच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करत होते. यावेळी त्यांना केळीच्या रासायनिक संयुगामुळे नर उंदरांत तणावपूर्ण प्रतिक्रिया निर्माण होत असल्याचे आढळले. 


"सायंस अॅडव्हान्स" नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात नमूद करण्यात आले आहे की, "नर उंदरांत तणाव दिसून आला." मॉन्ट्रियल मॅगकिल युनिव्हर्सिटीच्या संशोधन पथकाला असे आढळले की, "गरोदर व स्तनदा मादी उंदरांनी अनोळखी नर उंदरांबद्दल आक्रमकता दर्शविली व लघवीच्या चिन्हासह प्रतिसाद दिला. नर उंदीर त्यांच्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. परंतु, मादी उंदीर त्यांना पळवून लावण्यासाठी व सावध करण्यासाठी रसायने सोडली. त्यानंतर नर उंदराने त्यांच्यापासून अंतर राखले."


गंध घेण्याच्या शक्तीने संकेत समजतात

या संशोधनाचे वरिष्ठ लेखक प्रोफेसर जेफ्री मोगिल यांच्या म्हणण्यानुसार, "उंदीर व इतर अनेक सस्तन प्राणी त्यांच्या गंध घेण्याच्या शक्तीचा वापर करतात. प्राण्यांमध्ये लघवीच्या वासाचा म्हणजे मूत्रगंधाचा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा अर्थ असतो. पण, या संशोधनात जे आढळले ते वेगळेच आहे. गंध घेण्याचे संकेत सामान्यतः नर एखाद्या मादीला पाठवतो. असे संकेत क्वचितच मादा उंदीर नराला पाठवते. पण, या प्रकरणात मादा उंदीर नर उंदराला दूर राहण्यासाठी असे संकेत पाठवत होती असे संशोधकांचे म्हणणे आहे."


कोठून आली केळीची भीती 

संशोधकांना स्तनदा व मादा उंदरांच्या लघवीमध्ये "एन-पेंटाइल एसीटेट" (N-Pentyl Acetate) नामक संयुग आढळले. हे संयुग केळीसह अनेक फळांत आढळणाऱ्या संयुगासारखे आहे. केळीचा अर्क बनवण्यासाठी ते फळांतून काढले जाते. या रसायनामुळे नर उंदरांतील हार्मोनमध्ये बदल होतो. संशोधकांच्या पथकाने उंदरांच्या पिंजऱ्यात केळीचा अर्क टाकला असता त्यांच्यातील तणावात मोठी वाढ झाली. हा तणाव उंदरांच्या लढाईत निर्माण होणाऱ्या तणावाएवढाच होता. यावरुन मादा उंदीर नसली तरी रसायन नर उंदराला भडकावू शकते हे सिद्ध झाले.


गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

1 किमी लांबीचा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर काय होईल? मानवी कल्पनेपलीकडील विध्वंस होईल...असे 4 वेळा घडलेही आहे

"अथांग ब्रह्मांडातील सजीवसृष्टीचे नेतृत्व करणारी आपली वसुंधरा 37 हजार वर्षांत एकदा संपूर्ण सजीवसृष्टी नष्ट होईल अशा लघुग्रहाला धडकते," असा धक्कादायक दावा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात "नासा"ने केला आहे. 1 किमीपेक्षा जास्त व्यासाचा एखादा लघुग्रह पृथ्वीला धडकला, तर पृथ्वीवरील संपूर्ण जीवन संपुष्टात येऊ शकते असे मानले जाते. या धडकेने लाखो लोकांचा मृत्यू होईल. एवढेच नाही तर त्यानंतर होणाऱ्या भयावह भूकंप, ज्वालामुखीचे विस्फोट व त्सुनामीसारख्या आपत्तीतही कोट्यवधींचा बळी जाईल. 




'डेलीस्टार'च्या वृत्तानुसार, असा एखादा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर राखेचे ढग सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास अडथळा निर्माण करतील. जग अनेक वर्ष अंधारात बुडून जाईल. यामुळे उर्वरित लोकांच्या जगण्याची आशा संपुष्टात येईल. विशेष म्हणजे इतिहासात अनेकदा आपल्या पृथ्वीने अशा महाकाय लघुग्रहांचा आघात सहन केला आहे. पण, प्रत्येकवेळी आपली वसुंधरा काळाच्या कसोटीवर खरी उतरली व तिने स्वतःच स्वतःची पुनर्बांधणी केली. 


लघुग्रहानेच दिली ग्लोबल वॉर्मिंगला चालना


आतापर्यंत आपल्या पृथ्वीला तब्बल 4 वेळा अशा संकटांचा सामना करावा लागला आहे. सुमारे 2.229 अब्ज वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात कोसळलेल्या एका लघुग्रहाने याराबुब्बा क्रेटर (विवर) तयार झाले होते. या टक्करीपूर्वी पृथ्वी मुख्यतः एक बर्फाळ ग्रह होता. पण, याराबुब्बा धडकेमुळे ग्लोबल वॉर्मिंगला चालना मिळाली. त्यावेळी जवळपास अर्धा ट्रिलियन टन पाण्याची वाफ हवेत मिसळली. रशियाच्या उत्तर सायबेरियातील 3.50 कोटी वर्ष जुने महाकाय विवरही लघुग्रहाच्या धडकेने तयार झाले आहे. हे विवरही लघुग्रहाच्या धडकेने झालेल्या विध्वंसाचे एक आदर्श उदाहरण आहे. 


लघुग्रहांमुळेच झाला डायनासोरचा अंत


मेक्सिकोतील चिक्सुलब (Chicxulub) क्रेटरही 6.60 कोटी वर्ष जुने आहे. हे क्रेटर पृथ्वीवरील डायनासोरह 75 टक्के सजीवांचा सफाया करणाऱ्या एका लघुग्रहाच्या धडकेने तयार झाल्याचे मानले जाते. सर्वात अलीकडील घटना 19 व्या शतकातील आहे, ज्यात मेक्सिकन खगोलशास्त्रज्ञ जोस बोनिला यांनी 1883 मध्ये सूर्यासमोरून मार्गक्रमण करणाऱ्या 300 हून अधिक रहस्यमय वस्तूंचा शोध लावला होता. 2011 मध्ये असे आढळून आले की, ते कदाचित कोट्यवधी टन वजनाच्या धूमकेतूचे तुकडे आहे, जे पृथ्वीपासून काहीशे किमी अंतरावरुन गेले होते. 


नुकतीच झाली लघुग्रहासोबत चकमक


उल्लेखनीय बाब म्हणजे Asteroid 388945 (2008 TZ3) नामक एक लघुग्रह नुकताच पृथ्वीच्या जवळून गेला होता. शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 7,484,704 लाख किमी अंतरावरुन जाणाऱ्या सर्वच लघुग्रहांचा समावेश धोकादायक लघुग्रहांच्या श्रेणीत केला आहे. हा लघुग्रहही याच श्रेणीतील होता. तो मेच्या मध्यात पृथ्वीपासून 5,632,704 किमी अंतरावरुन पुढे गेला. 


490 मीटर लांबीचा हा लघुग्रह अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील 440 मीटर उंच एम्पायर स्टेट बिल्डिंगहूनही मोठा होता. तो पृथ्वीला धडकला असता तर मोठा विध्वंस झाला असता. उल्लेखनीय बाब म्हणजे 1908 मध्ये पूर्व सायबेरियात कोसळणाऱ्या एका उल्कापिंडाने 200 मीटर परिघातील सर्वकाही नष्ट केले होते. 100 मीटरहून लांब असणारा कोणताही उल्कापिंड ज्वालामुखीच्या स्फोटाच्या तुलनेत जवळपास 10 पट जास्त विध्वंस घडवून आणतो.