पंचतंत्रात एका ठिकाणी वानरं गुंजा जमा करून त्याभोवती शेकत बसल्याचा उल्लेख आहे.
कोणा पर्वतातील जंगलात वानरांचा कळप राहात होता.थंडीच्या दिवसांत तेथे अति शीत वारे वाहू लागले. त्यातून पाऊस पडल्यामुळे ती वानरे गारठून गेली. तेव्हा त्यांतील काही वानरांनी अग्नीसारख्या दिसणाऱ्या तांबड्या गुंजा गोळा केल्या आणि त्यांभोवती बसून सारी वानरे अंग शेकू लागली. ते दृश्य सूचिमुख नावाच्या पक्ष्याने पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, "अरे मूर्खानो, गुंजा जरी विस्तवासारख्या लाल असल्या,तरी त्यामुळं तुम्हांला ऊब मिळणार नाही. थंडीपासून निवारण करण्यासाठी वनप्रदेशातील गुहा अथवा गिरिकंदरं यांचा आश्रय घ्या."


