भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

वानरांची शेकोटी..!




पंचतंत्रात एका ठिकाणी वानरं गुंजा जमा करून त्याभोवती शेकत बसल्याचा उल्लेख आहे.


कोणा पर्वतातील जंगलात वानरांचा कळप राहात होता.थंडीच्या दिवसांत तेथे अति शीत वारे वाहू लागले. त्यातून पाऊस पडल्यामुळे ती वानरे गारठून गेली. तेव्हा त्यांतील काही वानरांनी अग्नीसारख्या दिसणाऱ्या तांबड्या गुंजा गोळा केल्या आणि त्यांभोवती बसून सारी वानरे अंग शेकू लागली. ते दृश्य सूचिमुख नावाच्या पक्ष्याने पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, "अरे मूर्खानो, गुंजा जरी विस्तवासारख्या लाल असल्या,तरी त्यामुळं तुम्हांला ऊब मिळणार नाही. थंडीपासून निवारण करण्यासाठी वनप्रदेशातील गुहा अथवा गिरिकंदरं यांचा आश्रय घ्या."

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

चंद्रावर न्यूक्लिअर रिॲक्टर बांधण्याची शर्यत; भारत कुठे?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ व अवमानास्पद विधानांमुळे भारत अमेरिकेपासून फार दूर गेल्याचे चित्र आहे. ट्रम्प प्रशासन रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्यावरून सातत्याने भारतावर टीका करत आहे. त्यामुळे आत्ता भारत चंद्रावर न्यूक्लिअर रिॲक्टर अर्थात अणुभट्टी तयार करण्याच्या शर्यतीत चीन व रशियाच्या मागे उभा राहील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, चंद्रावर पोहोचणे ही आता केवळ शर्यत राहिलेली नाही, तर भविष्यात शक्ती दाखवण्याचा व वर्चस्व प्रस्थापित करण्याचा एक नवा मार्ग बनला आहे.

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

सरकारी कार्यालयातील जातीभेद: सतीश डोंगरे प्रकरण आणि सामाजिक वास्तव

भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे उलटली, तरीही जाती आधारित भेदभावाचे विषारी पडसाद आजही समाजात आणि अगदी सरकारी यंत्रणेतही कायम आहेत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील मध्य प्रदेश गृह विकास महामंडळात कार्यरत असिस्टंट जनरल मॅनेजर सतीश डोंगरे यांच्यावर झालेला कथित भेदभाव हा याच सामाजिक कुरीतीचा एक धक्कादायक नमुना आहे. गेल्या दीड वर्षांपासून डोंगरे यांना टेबल आणि खुर्ची नाकारण्यात आली असून, त्यांना जमिनीवर बसून आपले काम करावे लागत आहे. या प्रकरणाने केवळ सरकारी यंत्रणेची असंवेदनशीलताच उघड केली नाही, तर भारतीय संविधानातील समता आणि न्यायाच्या तत्त्वांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे प्रकरण समाजातील खोलवर रुजलेल्या जातीवादाच्या समस्येचे आणि त्याला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर उपाययोजनांचे प्रतीक आहे.

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

मुथुलक्ष्मी रेड्डी: भारताच्या पहिल्या महिला आमदार आणि देवदासी प्रथेच्या विरोधातील लढवय्या

भारताच्या उत्थानात महिलांचे योगदान हे एखाद्या तेजस्वी दीपस्तंभासारखे आहे. कुटुंबाच्या स्नेहमयी मायेपासून स्वातंत्र्याच्या रणांगणापर्यंत, शिक्षण, विज्ञान, कला, आरोग्य व सामाजिक क्रांतीच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इतिहास रचला. त्यातून भारताच्या प्रगतीचा मार्ग प्रकाशमान झाला. महिलांनी आपले अटळ धैर्य, असीम करुणा तथा दृढनिश्चयाने केवळ आपली स्वप्नेच सत्यात उतरवली नाही, तर सामाजिक वाईटांविरोधातही कंबर कसून लढा दिला. भारताच्या इतिहासात अशा अनेक थोर महिला होऊन गेल्यात. चला तर मग पाहूया महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा संघर्षमय जीवनपट... मुथुलक्ष्मी रेड्डी ह्या भारताच्या पहिल्या हाऊस सर्जन तथा स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिल्या महिला आमदार होत्या. त्यांचा जन्म 30 जुलै 1886 रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण स्वामी अय्यर असे होते. ते महाराजा महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांच्या मातोश्री चंद्रामाई यांचा देवदासी समुदायाशी संबंध होता. 

अय्यनकाली: दलितांचा स्वाभिमान आणि सामाजिक क्रांतीचा प्रणेता

आज केरळ भारतातील एक पुढारलेले राज्य म्हणून ओळखले जाते. पण याच केरळात दलितांना शतकानुशतके आपल्या मानवाधिकारांपासून वंचित राहून जनावरांसारखे जीवन जगावे लागत होते. अस्पृश्य घोषित करण्यात आलेल्या या वर्गाने ज्या गुलामी व वर्चस्ववादाचा अनुभव घेतला, तो अतिशय वेदनादायी व भयंकर असा होता. धनदांडगे जमीनदार व सरंजामदारांचे गुलाम म्हणून राहणे हीच त्यांची नियती होती. पुरुषच नव्हे तर महिलांसह सर्वच लहानथोरांना उन, वारा, पाऊस, थंडी आदी कशाचीही पर्वा न करता या लोकांची धान्याची कोठारे कायम भरून राहतील याची तजवीज करावी लागे.

आपल्या आयुष्यात काही बदल होईल याची किंचीत कल्पनाही त्यांना करता येत नव्हती. अशा या बिकट परिस्थितीत अय्यनकाली यांचा जन्म झाला. त्यांनी दलितोद्धाराचे महान कार्य हाती घेतले. त्यांच्या अथक संघर्षामुळे दलितांचा उत्कर्ष झाला. केरळच्या सामाजिक व राजकीय संरचनेत अमुलाग्र बदल झाला. त्याचा परिणाम म्हणून आज केरळ जे आहे ते दिसते. चला तर मग घेऊया महात्मा अय्यनकाली यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा...

राणी वेलू नाचियार: ईस्ट इंडिया कंपनीला धूळ चारणारी शिवगंगाची वीर मंगई

भारताच्या गौरवशाली इतिहासात अनेक वीरांगणांनी आपले दुर्दम्य साहस, प्रखर बुद्धिमत्ता व स्वातंत्र्याच्या अथक संकल्पाने काळाच्या पडद्यावर अमर कहाण्या रचल्या. या धाडसी स्त्रियांनी परकीय आक्रमकांच्या अन्यायी सत्तेला केवळ ललकारलेच नाही, तर आपल्या कर्तृत्वाने स्वातंत्र्याच्या लढ्याला एक नवी चेतना दिली. आपल्या युद्ध कौशल्याच्या जोरावर इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली अमिट छाप सोडली.

अशा महिलांच्या शौर्याच्या व बलिदानाच्या गाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेरणेचा अखंड झरा म्हणून वाहतात. चला तर मग आज पाहूया शिवगंगाची राणी वेलू नाचियार या अशाच एका तेजस्वी वीरांगणेचा इतिहास...