भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

रविवार, २० जुलै, २०२५

डॉ. बाबासाहेब आंबेडकर | जीवन, विचार आणि ऐतिहासिक योगदान

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या इतिहासातील एक तेजस्वी तारा, दलित उद्धाराचे प्रणेते व सामाजिक समतेचे अग्रदूत होते. त्यांनी आपल्या जीवनातून सामाजिक समतेची अमर ज्योत प्रज्वलित केली. अस्पृश्यतेच्या काळोखातून बाहेर पडत शिक्षणाच्या तेजाने व अटळ संकल्पाने समाजातील उपेक्षितांना आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला. जातीभेदाच्या बेड्या तोडून, अन्यायाला आव्हान देत मनुष्याच्या मनात स्वातंत्र्य व समतेची स्वप्ने रुजवली. विशेषतः संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी न्याय व बंधुत्वाचा अढळ पाया घातला.

चला तर मग उद्याच्या 134 व्या 'भीम जयंती'निमित्त पाहूया भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवघ्या जगाला थक्क करणारा जीवन प्रवास...

अहिल्याबाई होळकर : न्यायप्रिय व लोककल्याणकारी राणीचा आदर्श जीवनप्रवास

महिला शासकांनी आपले कर्तृत्व व नेतृत्वाच्या जोरावर इतिहासाच्या पानावर आपला अमिट ठसा उमटवला. प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत त्यांनी राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता, धैर्य व दूरदृष्टीने समाजाला दिशा दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एक नवा अध्याय रचला. आपल्या शासनकाळात त्यांनी केवळ सत्ताच टिकवली नाही, तर समाजात प्रगती, सुधारणा व स्थैर्य आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच लिंगभेदाच्या सीमा तोडल्या गेल्या.

अहिल्याबाई होळकर मराठा साम्राज्यातील माळवा प्रांताच्या अशाच एक थोर व दूरदृष्टीच्या शासक होत्या. त्यांनी न्याय, धर्म, प्रशासन व समाजसुधारणांत आपले अतुलनीय योगदान दिले. त्यांच्या नम्र, न्यायी व कणखर नेतृत्वामुळे त्यांना पुण्यश्लोक ही पदवी मिळाली. त्यांचा त्रिशताब्दी जयंती सोहळा शनिवारी संपन्न झाला. चला तर मग आज पाहूया पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास...

संत कबीर : विचार, दोहे आणि जीवनप्रवास

 15 व्या शतकात वाराणसीत जन्मलेले कबीर हे केवळ संत किंवा कवी नव्हते, तर एक थोर सामाजिक सुधारक व आध्यात्मिक क्रांतिकारक होते. जुलाहा समाजात वाढलेल्या या साध्या विणकराने आपल्या तीक्ष्ण बुद्धीने व हृदयस्पर्शी दोह्यांनी हिंदू - मुस्लिम धर्माच्या सीमा ओलांडून मानवतेचा थोर संदेश दिला. कर्मकांड, धर्मांधता व सामाजिक भेदभाव यांना आपल्या निर्भिड वाणीतून आव्हान दिले. 'मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में', असे म्हणत ईश्वराला मंदिर-मशिदीत नव्हे, तर प्रत्येक माणसाच्या हृदयात शोधण्याचा मार्ग दाखवला. त्यामुळे सूफी आणि भक्ती परंपरांचा अनोखा संगम असलेले कबीर आजही त्यांच्या शाश्वत विचारांनी लाखो लोकांना प्रेरणा देतात.

संत कबीर यांची जयंती गत 11 जून रोजी साजरी करण्यात आली. चला तर मग आज संत कबीर यांच्या शिकवणीचा धुंडाळा घेऊया...

चे गेव्हारा : एक क्रांतीकारी योद्धा | जीवनचरित्र व विचारधारा

जगाच्या इतिहासात अनेक क्रांतिकारकांनी आपली धाडसी कृती व प्रखर विचारांनी स्वातंत्र्य, समता व न्यायाची मशाल पेटवली. त्यांचा लढा एका देशासाठी स्वाभिमान व प्रेरणेचा झरा बनला, तर दुसऱ्या देशासाठी शत्रूत्वाचे कारण ठरला. हे क्रांतिकारक आपल्या मातृभूमीत नायक म्हणून पूजले गेले. पण विरोधकांनी त्यांना खलनायक ठरवले. चे गेव्हारा हे असेच विरोधाभासांनी नटलेल्या एका गाथेचे नायक होते. त्यांचे नाव जगातील काही लोकांसाठी क्रांतीचे, तर काही लोकांसाठी दहशतीचे प्रतीक बनले.

चला तर मग आज  पाहूया अर्जेंटिनाच्या एका अशा मुलाची कथा जो बालपणी अस्थमाचा रुग्ण होता, पण तरुणपणी अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनला. चला पाहूया गरिबांच्या हृदयात बदल अन् क्रांतीची ज्योत पेटवणारे कोण होते चे गेव्हारा?

शनिवार, १९ जुलै, २०२५

अण्णाभाऊ साठे – लोककथांचे सम्राट आणि श्रमिकांचा आवाज

मातंग (मांग) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख वंचित (दलित) समुदाय आहे. हा समाज ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक व आर्थिक विकासापासून दूर राहिला. पण या समाजाची संस्कृती फार समृद्ध व वैविध्यपूर्ण आहे. ही संस्कृती त्यांच्या लोकपरंपरा, कला, धार्मिक श्रद्धा व सामाजिक रीतिरिवाजांमधून दिसून येते. याच मातंग समाजात अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे थोर व्यक्ती होऊन गेले. ज्यांनी अवघा दीड दिवस शाळेत जाऊन समाजातील धन, जात व धर्मदांडग्यांना प्रखर आव्हान दिले. अण्णांची येत्या 18 जुलै रोजी पुण्यतिथी आणि 1 ऑगस्ट रोजी जयंती आहे. 

चला तर मग आज 'पाहूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा धगधगता संघर्षमय जीवनपट...